Posts

Showing posts from October 18, 2020

नवरात्री विशेष

Image
🎪 नवरात्री विशेष भाग : १ 🚩 आज पासून आपण देवीच्या ९ रूपाची एक एक करून माहिती घेणार आहोत...! 🔴 #दुर्गेचे_पहिले_रूप_शैलीपुत्री' 🔴 वन्दे वञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम् | वृषारूढाम् शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम् || ▶ दुर्गेचे पहिले रूप 'शैलीपुत्री' या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला 'शैलपुत्री' असे नाव पडले आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते. या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत-महंत आपल्या मनाला 'मूलाधार' चक्रात स्थिर करतात. या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरवात होते. 👉 या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हाता कमळाचे फूल आहे. आपल्या पूर्वजन्मात तीने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे नाव 'सती' असे होते. त्यांन विवाह भगवाण शंकरांशी झाला होता. ▶ एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला. या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते. परंतु, त्याने शंकराला निमंत्रित केले नव्हते. आपले वडील...

नवरात्री विशेष

Image
🎪 नवरात्री विशेष भाग : २ 🚩 🔴 #दुर्गेचे_दुसरे_रूप_ब्रह्मचारिणी'  🔴 🔸 दधाना करपदमाभ्यामक्ष मालाकमंडलू। देवी प्रसिदतु मयि ब्रम्हाचारिण्यनुमत्तमा।। 🔸 नवशक्तीपैकी 'ब्रम्हचारिणी' हे दुर्गेच्या दुसरे रूप आहे. ▶  'ब्रह्म' या शब्दाचा अर्थ तपस्या आहे.  ब्रम्हाचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. नवरात्राच्या दुसर्या दिवशी या मातेची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'स्वाधिष्ठान' चक्रात स्थिर होते.  या चक्रात मन स्थिर करणार्याला तिची कृपा आणि भक्ती प्राप्त होते.  👉 या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे. तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असतो. तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला त्यावेळी नारदमुनींने तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली होती. या तपस्येमुळे या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात. ▶ एक हजार वर्षापर्यंत तिने फळे खाऊन तपश्चर्या केली. उपवास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला होता.  या तपश्चर्येनंतर तीन हजार वर्षांपर्यंत केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन दिवस ...

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ⚔

Image
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - ५१ ⚔️ ▶ “मग राजे आता विशाळगडी आहेत तर आणि आमचे सरलष्कर कुठं आहेत?” जिजाबाईंना नेताजींचा करीणा काय ते कळेना. “न्हाई मासाब, राजं फोंड्याच्या रोखानं कोकणात उतरल्यात. आन्‌...” बहिर्जीचा साद कातरला. नजर जिजाऊंना आणि बाळधन्याच्या पायांवर पडली. “आणि काय नाईक?” जिजाऊंना आणि कुणी कामी तर आले नाही ना, अशी शंका आली. 👉 “कसं सांगावं मासाब! अशी खबर सांगण्यापरास जीब झडल्याली ब्येस.” “नाईक, जीभ झडली तरी सत्य झाकून राहणार थोडंच? बोला.” जिजाऊंनी बहिर्जीला जखडून टाकला. “विशालगडावयनं राजांनी सरलस्करांस्री खलिता धाडला. 'सरलस्कर असून समयास कैसे पावला नाहीत? दाखल होण्यास दिरंग केला. सबब तुम्हास बरतर्फ करतो आहोत', असा हुकूम दिला. त्यो वाचून नेताजी बिथारले. राजांच्यावर रागं झालं. राजांस्री पारखं होऊन इज्यापूरच्या दरबाराला फौजासुद्धा जाऊन मिळाले!!” मुंडासे डुलवून बहिर्जी गदगदल्या सुरात बोलला. जिजाबाई डोळे ताणून बहिर्जीच्या धुळकटलेल्या मुंडाशाकडे बघतच राहिल्या. बहिर्जीच्या अंगावरच्या घोंगडी काचोळ्यांकडे संभाजीराजे रोखून बघत होते. त्यांच्या काना...