Posts

Showing posts from November 29, 2020

बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )

Image
🚩  बाजींद भाग - ५० ⚔️ 👉बाजींदचा शेवटचा भाग🙏 ▶सखाराम….हे …हेच आहेत आमचे "बहिर्जी नाईक"…! "हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख". आणि सखाराम च्या अंगावर सरसरून काटा आला. त्याला सर्व गोष्टीचा उलघडा होऊ लागला, की उंबराच फुल म्हणताच आम्हाला रायगडावर एव्हढा का मान मिळत होता….आमचा घोडा हा जवळ असला की का पळून जात होता. पण, बहिर्जी नाईकांनी सखाराम बनून का आम्हास्नी रायगड दावला..आणि रात्रीच्या वेळी तुम्ही कुठे गायब होत होता….हा प्रश्‍न मात्र सखाराम ने बहिर्जी नाईकांना केला….! नाईक हसले आणि बोलले…..गड्या, या खंडोजी ने स्वराज्यासाठी खूप काही भोगले आहे, हा वेडा स्वताहून तर काय हे लोकांना सांगणार नाही, म्हणून तुमच्या कानावर याची महती घातली. रात्रीच्या वेळी स्वराज्याच्या महत्वाच्या बातम्या स्वराज्यातील अनेक हेराकडून मला मिळत असायच्या त्यामुळे मला जावे लागत असे, पण सावित्रीने मला या कमी खूप मदत केली..जराही शंका न येऊ देता तुम्हाला सर्वकाही समजून सांगितले तिने…! आणि वस्ताद काकासारखा निष्ठावान हेर नक्कीच याचा मागोवा काढत तुम्हाला इथवर आणणार हे आम्हाला ठाऊक होते…काय काका बरो...

बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )

Image
🚩  बाजींद भाग - ४९ ⚔️ ▶स्वराज्याची राजधानी म्हणून आम्ही रायगड निवडला, पण त्या राजधानीच्या अस्तीनीतील निखारे तुमच्या मुळे बाजूला झाले…आता आमच्या डोक्यात केवळ दक्षिण-दिग्विजय आहे…! राजे सावित्रीकडे पाहत बोलले…..सावित्री..तुझ्यासारख्या मुली ही खरी स्वराज्याची दोलत आहे. चुलीपुढे काम करणारे हात स्वातंत्र्यासाठी रणांगण गाजवू शकतात हे तुझ्या कृतीने तू दाखवून दिल्रेस…खंडोजी, तू मोठा भाग्यवान आहेस, तुला सावित्री सारखी पत्नी मिळत आहे..खंडोजी मान खाली घालून केवळ ऐकत होता…! आणि बाजिंद. राजांच्या आवाजाने बाजिंद ने पुन्हा मुजरा केला. राजे बोलू लागले. महाराष्ट्र ही बुद्धिवंतांची जननी, पण बुद्धी बरोबर कर्तव्य, स्वाभिमान, संस्कृतीची जपणूक करणारे तुमच्यासारखे वीर आम्हाला भेटले नसते, तर असे हजारो शिवाजी मिळूनही महाराष्ट्र स्वतंत्र झाला नसता…! ▶यावर बाजिंद बोलु लागला. राजे…..असे बोलून मला लाजवू नये…..१०० वर्षे आम्ही आमच्या मूळ पुरुषाचा हा अनमोल ठेवा जणू काही तुमची वाट बघत जपला होता…आता आम्हाला मरण जरी आले तरी आम्ही तयार आहोत. हिंदवी स्वराज्याचे हे पवित्र कार्य, आसेतु हिमाचल असेच सुरु राहील यासा...