Posts

Showing posts from February 22, 2021

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ ▶️📜 २२ फेब्रुवारी इ.स.१६६५ छत्रपती शिवरायांनी कर्नाटकातील "कारवार" जिंकले. छत्रपती शिवरायांचा कारवारच्या खाडीच्या तोंडाशी मुक्काम होता. येथे शेरखानने इंग्रज व तेथील सर्व व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम जमवून ती नजराण्याच्या स्वरूपात छत्रपती शिवरायांच्या समोर रूजू केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▶️📜 २२ फेब्रुवारी इ.स.१६८४ केग्विनने इंग्लडच्या राजाला पत्र केग्विनने २२ फेब्रुवारी १६८४ रोजी पुन्हा इंग्लडच्या राजाला पत्र पाठवून छत्रपती संभाजीराजांनी आपल्या सरहद्दीवर ३०००० सैन्य मुंबईपासून तीन मैलांवर असणार्‍या पलतात ( Paltata पलते ) या बेटावर उतरवून ते बेट व्यापण्याचा प्रयत्न केल्याचे कळवले होते. केग्विन हा सातत्याने चार्लस राजाला छत्रपती संभाजी महाराजांच्या शक्तीची व आक्रमक धोरणाची कल्पना यासाठी देत होता की, जेणे करुन छत्रपती संभाजी महाराजांशी तह करुन सलोखा निर्माण व्हावा. त्याप्रमाणे एप्रिल १६८४ पूर्वी केग्विनने तहाच्या बोलणीसाठी कॅप्टन गॅरी, थाॅमस विल्किन्स , राम शेणवी यांना तहाच्या बोलणीसाठी छत्रपती संभाजी महाराजांच्याकडे पाठवले त्यांनी बिर...

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ⚔

Image
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - १३८ ⚔️ ▶ “सरलष्कर सरकारांचे बंधूच आहेत. ते रामराजांच्या पाठीशी मामासाहेब म्हणून उभे राहतील, असा आम्हाला विश्वास वाटतो. इतरांची आम्ही समजूत पाडू. युवराज रायगडी स्वामी म्हणून येण्यात धोका आहे. जे करणं असेल ते तातडीनं आणि गुसपणं करावं लागेल. बाळराजांना मंचकारोहण करून कारभारी सूत्रे महाराणींनी आपल्या हाती घेतल्याखेरीज राज्याची बरी निर्गत लागणार नाही. या वेळी आपण खंबीरपणं धीर बांधून असावं.” “आम्ही खंबीरच आहोत. तुम्ही अवघ्यांसह बाळराजांच्या पाठीशी असा म्हणजे झालं.” “कुलदैवताच्या आणभाकेनं आम्ही ते करू. निर्धास्त असावं.” 👉सोयराबाईंच्या राजगळाला अण्णाजी हा हिकमतीचा व प्रधानमंडळातील सर्वांत सुळसुळता मासा लागला. हा मासा जाळ्यात फसणारा नव्हता. आपल्या अजब अक्कलहुशारीने जाळे विणणारा होता! छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र असता, युवराज असता संभाजी राजांना बगलेला टाकून रामराजांची गादीवर स्थापना करण्याचा घाट अण्णाजींनी का घालावा? त्याला अनेक कारणे होती. एकतर आपल्या घरची गोदावरी ही स्त्री संभाजीराजांच्यामुळेच नाहक खर्ची पडली हा ठाम सल त्यांच...