Posts

Showing posts from November 28, 2020

बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )

Image
🚩  बाजींद भाग - ४८ ⚔️ ▶साऊ…ज्यांच्यामुळे हा खंडोजी घडला, हे माझे वस्ताद काका…! सावित्री पुढे आली आणि तिने वस्ताद काकांचा आशीर्वाद घेतला…! राजे येसाजीराव बोलले……वस्ताद काका…आता आम्हीही तुमच्या खांद्याला खांदा लावू लढणार स्वराज्यासाठी…! सखाराम हे सारे भरल्या डोळ्यांनी पाहत होता…काय ही वेडी माणसे आहेत. वयाचा उत्तरार्ध सुरु आहे, मरण केव्हाही यांना गाठेल असे वय जगत आहेत, मात्र भाषा करत आहेत स्वराज्यासाठी लढायची….. खरोखर ही हिंदवी स्वराज्याची मांदियाळी आमच्या नशिबी का नाही… किती दिवस आम्ही संसाराच्या गाडग्या मडकक्‍्यासाठी जगायचे…सखाराम चे अश्रू अनावर होत होते…! ▶दरम्यान जंगलातील पूर्वे बाजूकडून शिंगे तुतारी कर्णे गर्जू लागली…! 👉सर्वांनी ताडले……शिवरायांचे पथक आले. सारे गडबडीने तिकडे जायला निघाले. जंगलातील त्या पठारी भागात, एका पांढऱ्याशुभ्र घोड्यावर हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज मानाने डोलत होता. मागोमाग पाचशे-सहाशे हत्यारबंद धारकरी दोडत येत होते. आणि एका काळ्या घोड्यावर खुद्द राजश्री छत्रपती शिवाजीराजे बसले होते. डोक्‍यावरील मंदीलाला मोत्याचे घोस लावून रोवलेला तुरा हिन्काळत राज...

बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )

Image
🚩  बाजींद भाग - ४७ ⚔️ ▶गुप्तता हा स्वराज्याचा आत्मा आहे, पण इतकी बेमालून गुप्तता राखून तुम्ही जे काही काम केले आहे त्यासाठी या म्हाताऱ्या गुप्तहेराचा तुम्हाला मानाचा नाही काका……उलट मुजरा तुम्हाला असेल आमचा व खुद्द बहिर्जी नाईकांचा. ज्याला करंगळी धरून लहानाचे मोठे केले त्याला सुध्दा कर्तव्यात कसूर केली म्हणून आपण खंडोजी समजूनच कडेलोट केले ना… स्वराज्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे आहे हा शिवशाहीचा शिरस्ता तुम्ही जागून दाखवलात….तुम्हाला मानाचा मुजरा. वस्ताद काका व खंडोजी एकमेकांच्या मिठीत पडून रडू लागले. त्यांची ती विलक्षण गुरुशिष्याची भेट पाहून सखाराम, नारायण, सर्जा व मल्हारी सुद्धा रडू लागले होते…. ▶इतक्यात …..गुहेचा दरवाजा वाजला. खंडोजी ने दार उघडले, आणि बाहेर एक हेजीब वर्दी द्यायला आला होता…. तो बोलला……दस्तूरखुद्द शिवाजीराजांचे अश्वपथक जंगलाच्या पूर्वेकडून येताना दिसत आहे…! राजे येताहेत…..खंडोजी बोलला… तू चल पुढे…राजांच्या अश्वांचा ताबा घे…आम्ही क्षणात आलोच…! 👉खंडोजी बोलू लागला….. काका..चला महाराज येत आहेत. सोबत बहिर्जी असावेत…कारण यशवंतमाची जिंकून आसपासच्या १०० राज्यांची...