Posts

Showing posts from March 28, 2021

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ आग्र्याहून सुटल्यानंतर छत्रपती शिवरायांनी उठवलेल्या वादळी झंझावाताला रोखण्यासाठी औरंगजेबाने मुघल सरदार दाऊदखानला दख्खनमध्ये पाठवले. आजच्या दिवशी दाऊदखान फौजफाटा घेऊन नगरला पोहोचला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २८ मार्च इ.स.१६८३ (चैत्र वद्य द्वितीया, शके १६०३, संवत्सर सिद्धार्थी, वार सोमवार) छत्रपती संभाजी महाराजांचे सरदार नारोजीराव यांनी धारूर किल्ल्यावर चाल केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या हुकुमानुसार मराठे व-हाडपर्यंत मुलुखगिरी करत होते. मराठ्यांच्या मुलुखगिरीत त्यांची अनेक ठिकाणी मोगलांशी चकमक उडे. छत्रपती संभाजी महाराजांच्या नारोजी नावाच्या एका सरदाराने धारूर किल्ल्यावर आपल्या सैन्यासह चाल केली. किलअदारखान या किल्लेदाराशी सामना झाला. १०० मराठी सैन्य मारले गेले. किल्लेदाराने त्यांची डोकी कापून मनोरा रचला. १३ लोकांना जिवंत पकडले. मोगल सैनिक बहुतेक कामी आले. मात्र मराठ्यांनी प्रचंड पराक्रम गाजवून मोगल सैन्य कापून काढले. छत्रपती संभाजी महाराजांच्या सूचनेनुसार मराठी सरदारांचा यल्गार जबरदस्त होता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २८ मार्च इ.स.१७...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 २७ मार्च इ.स.१६६६ औरंगजेबाचे राज्यरोहन १६६६ हे वर्ष औरंगजेबाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे होते. यापूर्वीच बादशहा औरंगजेब स्वतःला मुघल सम्राट म्हणून सारे बादशाही सोपस्कार केले होते पण बादशाह शहाजहान जिवंत असल्यामुळे लोकांच्या दृष्टीने औरंगजेबाची ही बंडखोरीच होती. आता बादशाह शहाजहानच्या मृत्यूमुळे सिंहासनावर बसण्याची व शाही सोपस्कार करवून घेण्याचा नैतिक अधिकार औरंगजेबाला प्राप्त झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा दि. २७ मार्च १६६६ ला आग्रा येथे बादशहाचा राज्यारोहण केला. शिवराय त्यावेळी प्रवासातच होते. राज्यरोहणाच्या वेळी औरंगजेबाने आपल्या बहिणींना पुष्कळ संपत्ती दिली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २७ मार्च इ.स.१६६७ मिर्झाराजे जयसिंह यांनी नेताजी अन् त्यांचे चुलते कोंडाजी यांना २४ ऑक्टोबर १६६६ रोजी अटक केली होती. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. आजच्या दिवशी नेताजी पालकरांचे औरंगजेबाकडून धर्मांतर झाले. नेताजी पालकरांचे ‘मुहंमद कुलीखान’ असे नामकरण करण्यात आले. जून १६६७ ला और...

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ⚔

Image
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - १६८ ⚔️ ▶ महाराज विचारांवर फेर घेऊ लागले. त्यांच्या आणि धोंडशाला चाललेल्या अकबराच्या मनात टिपरी झडत होती, ती एकच - अलमगीर! आणि नेमक्या याच दिवशी, शाही सवारीच्या सजल्या हत्तीवर अंबारीत बसून झडती शाजणे, नौबती डंक्यांच्या उसळत्या गजरात, प्रचंड फौज पाठीशी घेऊन औरंगजेब बऱ्हाणपूरच्या वेशीत प्रवेशत होता! त्याची घारी नजर हौद्यातूनच बऱ्हाणपुराभोवतीची तटबंदी नीट उठली आहे की नाही, याचा तलाश घेत होती! खैरात मिळालेले फकीर, मुल्ला, मौलवी त्याला हात उठवून तोंडभर दुवा देत होते! 👉पालीहून रायगडी आलेले महाराज, गडाच्या दक्षिण बाजूला असलेल्या दारू कोठारासमोर मांडलेली तोफांची भांडी निरखीत निळोपंतांना म्हणाले, “फरांसिसांच्या वकिलानं दिला शब्द पाळला पेशवे?” 👉“जी, आताषीचा बारदानाही त्यांनी पावता केला आहे.” निळोपंतांनी अधिकाचा तपशील दिला. पन्हाळ्यावर भेटलेल्या डच वकील लेफेबेरने आपल्या दरबारी शिफारस करून तोफा व दारूगोळा रायगडी पाठविण्याची व्यवस्था केली होती. 🔊“मुहूर्त बघून या भांड्यांचं पूजन करून घ्या पंत.” कसल्यातरी विचारात गढलेल्या महाराजांनी, घोड्याचे थोपटाव...