Posts

Showing posts from March 31, 2021

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 ३१ मार्च इ.स.१६६५ दिलेरखानने पुरंदर गडाच्या पायथ्याशी तळ ठोकला (३१ मार्च १६६५) जयसिंगास ही बातमी समजताच त्याने दिलेरखानास मोगली फौजेची कुमक रवाना केली. पुरंदर व वज्रगड या दोन्ही किल्ल्यास वेढा घालण्यास फर्माविले. पुरंदरच्या पायथ्याशी आल्या आल्याच दिलेरखानाने गडावर हल्ला चढविला. गडावर मोगलाची फौज चालून आल्यावर किल्ल्यातील मराठ्यांनी हुशार राहून ह्या आपत्तीस तोंड देण्यासाठी ते सज्ज झाले. गडाच्या पायथ्यापासून नारायण पेठपर्यंत मोगली अफाट फौजेच्या चहूकडे राहुट्या, तंबू आणि शामियाने वरून दिसत होते. पुरंदरगड समुद्रसपाटीपासून ४५६४ फूट आणि पायथ्यापासून २५०० फूट उंच बालेकिल्ला. दुसरा भाग माची. याची उंची पायथ्यापासून २१०० फूट, बाले किल्ल्याला बळकट तटबंदी होती आणि मुख्य दरवाजा होता. तोच सर दरवाजा. गडाची राखणदारी करणारे प्रसिद्ध लढवय्ये होते आणि किल्लेदार होते प्रसिद्ध लढवय्ये मुरारबाजी. पुरंदरचा वेढा चालू असताना जयसिंगाने मोगल सैन्याच्या लहान मोठ्या फौजा रोहिडा, राजगड, तुंग, तिकोना ह्या किल्ल्याकडे पाठविल्या. त्या आसपासच्या मुलुखात स्वाऱ्या, जाळपोळ व लु...

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ⚔

Image
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - १७१ ⚔️ ▶आपल्या जवान पोराचे शिर काढून नेलेल्या खैरतचा काटा मनात रुपत असलेला, “पालखी' नावाचे गलबत बहाल करून थोरल्या छत्रपतींनी नावाजलेला मायनाक भंडारी एल्गाराचे बोलला, “ह्ये लई झालं. असं टांगतं किती दिस ऱ्हायचं? आमी, दवलतखान, संबळखान. आंगरं मिळून आरमारी फाट्याच्या एकवटीने जंजिऱ्याला धडका द्यावा म्हनताव.” 👉“नांदगाव, मुरुड, मांडला अशी पायदळाची फळी करून होड्यांवाटे जंजिऱ्याच्या खाडीतून चाल घ्यायची आम्ही शिकस्त करू.” मायनाकाला दादाजी रघुनाथांनी उचलून धरले. सर्वांनी त्या दोन्ही जाणत्यांना डुया डुलवून, हात उठवून जोड दिली. 👉 छत्रपती काही बोलत नव्हते! त्यांच्या डोळ्यांसमोर उभी होती पन्हाळ्याची सज्जाकोठी! शेवटच्या भेटीत आबासाहेबांनी काढलेले शब्द त्यांच्या काळजाला तोडत होते - “जंजिऱ्यावर सिही पाय देऊन आहे, याची चिंता बाळगा. मावळा व्हा!” 👉 महाराज काहीच बोलत नाहीत, हे ध्यानी आल्याने गोंधळलेले मसलतकरी चिडीचाप झाले. मसलत कुचमली. छत्रपतींचे मौन सोसवेनासे झालेला म्हातारा मायनाक पोटतिडकीच्या धाडसाने म्हणाला, “धनी, कशागुणं चिंता एवढी? आमी हायकी...

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ⚔

Image
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - १७० ⚔️ ▶“पंत, आपल्या कारवारतर्फेच्या सुभेदारास असेल त्या कुमकेनिशी अंजदीव बेटावर चाल घेण्यास हुकूम द्या. अंजदीव दस्त झाले पाहिजे. फिरंगी त्यावरही डोळा ठेवून आहे, हे कळवा त्यास." 👉पंतांच्या ध्यानीमनी नसलेला कोलदांडा छत्रपतींनी फिरंग्यांविरुद्ध खोलला. त्याने समाधान पावलेल्या निळोपंतांनी टोपीकरांची एक बाब पुढे घेतली, “मुंबईचे टोपीकर एका वजेनं नाराज झालेत स्वामी.” 🔊“कोण वजेन?” 👉“नागोठाण्यात गैरअंमल करणाऱ्या हबश्यांना मदत करता, असा आरोप ठेवून आपल्या सुंदरजी बाजींनी गोऱ्यांची दोन गलवतं नागोठाण्याच्या बंदरात अडकवून ठेवली आहेत. त्यासाठी टोपीकर घायकुत करताहेत.” 👉“निळोपंत, एका समयास चौबाजूंचा गनीम पेटता ठेवणे लागीचे नाही. सुंदरजींना कळवा, जरब देऊन टोपीकरांची गलबतं खुली करणे.” 👉“जी. कुतुबशाही दरबारकडून एक नजराणा आला आहे, स्वामी. चार लाख पगोड्यांचा तबकाचा.” 👉महाराज हसून निळोपंतांना म्हणाले, “तो नजराणा नाही पंत, ती मदत आहे. आम्ही आलमगिराविरुद्ध खडे ठाकावे, यासाठी आलेली! आमच्या अभिषेकसमयीही एवढी रक्कम नव्हती आली कुतुबशाहीकडून. पाहुण्याच्या...