Posts

Showing posts from November 17, 2020

बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )

Image
🚩  बाजींद भाग - ४० ⚔️ ▶ते मटकन खालीच बसले …..आता मात्र त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला होता…….! मनात काहीतरी विचारांचा गोंधळ सुरु झाला त्यांच्या आणि त्यांनी सोबत आणलेल्या शिलेदारांपैकी पाच जणांना आज्ञा केली …..गड्यानो तुम्ही त्वरित रायगड गाठा. महाराजाच्या खासगीत माझा निरोप पोच करा.. असे म्हणत त्यांनी एकाच्या कानात एक निरोप सांगून त्या पाच जणांना रायगडी रवाना केले. आणि सखाराम कडे पाहत तो बोलला… सखाराम, तुम्हाला ज्या महादेवाच्या मंदिरात सावित्री भेटली तिथे मला घेऊन जाऊ शकाल ? जी..जी..होय …इथून ४-५ कोसावरच असेल ते मंदिर…चला मी नेतो. असे बोलताच वस्ताद काकांनी सोबत उरलेल्या पाच धारकांची दोन तुकडीत विभागणी केली. २ जणांनी इथेच थांबा…सोबत आणलेला भगवा ध्वज एका काठीला बांधून इथेच थांबा..रायगडावरून काही लोक आले तर त्यांना समजायला सोपे जाईल. आणि उरलेले दोघे…. तुम्ही आमच्यासोबत चला.. ▶असे म्हणत सखाराम व त्याचे सवंगडी, वस्ताद काका आणि दोन धारकरी असे सात जण त्या पडक्या महादेवाच्या मंदिराकडे जाऊ लागले. मजल दरमजल करत पठारी भाग संपवून सारे त्या भयान जंगलात घुसले. अनेक वळणे, ओढे नाले ओ...

बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )

Image
🚩  बाजींद भाग - ३९ ⚔️ ▶काकांनी हातवारे करन खुण करत ते सारे गुहेमागे असलेल्या चोरवाटेने आत गेले… एकावेळी एकाच माणूस आत जाईल इतकी अरुंद चोरवाट तुडवत ते हेरखात्याच्या एका कक्षात पोहचले. तिथून आत गले ..नेहमीप्रमाणे अनेक हेरांची अनेक कामे तिये सुरूच होती…. काकांनी तिथे उभे असलेल्या एका हेराला प्रश्न केला …पंत कुठे आहेत ? त्या हेराने मुजरा करत समोरच्या कक्षाकडे बोट दाखवत सांगितले …त्या तिथ आहेत….! काका त ते चौधे लगबगीने त्या कक्षात गेले. पंत काहीतरी लिहण्यात मश्गुल होते. कक्षाचा दरवाजा उघडताना पंतांचे लक्ष काकांच्याकडे गेले आणि ते उठले….काका रायगडी गेलेले काम झाले का? होय….झाले काम..काका उत्तरले..! सारेजण तिथे असलेल्या बैठक व्यवस्थेवर विसावाले आणि काका बोलले…. पंत..नाईक कुठे असावेत काही अंदाज ..? काकांच्या या प्रश्नाने विस्मित झालेले पंत उत्तरले… नाही काका…नाईकांचा ठावठीकाणा केवळ नाईकांनाच माहिती असतो… पण, महाराजांच्या दक्षिणदिग्विजायची चाहूल आहे..कदाचीत त्यांचा मोर्चा दक्षिणेत असावा….. पण, नाईकांशी काय काम होते ….? एक दीर्घ श्वास घेऊन काका उत्तरले….काका ते परत सांगेन, पण म...

बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )

Image
🚩  बाजींद भाग - ३८ ⚔️ ▶हजारो हात खाली तो देह गेला आणि एका मोठ्या खडकावर आपटला आणि खाली खोल निबिड अरण्यात रक्ताने माखलेला खंडोजी गतप्राण झाला…. सूर्य उगवला. हजारो सूर्यकिरणांनी रायगड उजळून निघाला, पण गडावरील कोणाचेच लक्ष कामात नव्हते..सर्वांच्या मुखात एकच नाव होते खंडोजी…. आज एक नवीन अध्याय लिहला गेला. स्वराज्यात फितुरांना क्षमा नाही..इये भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते. खंडोजी चा अध्याय संपला. ▶यशवंतमाची वर भगवा ध्वज अभिमानाने डोलू लागला. राजे येसाजीराव आणि जिच्यामुळे खंडोजीला प्राण गमवावे लागले ती सावित्री चोरवाटेने विजापूर कडे रवाना झाली होती. भीमा जाधव शिाच्य हातून ठार झाला होता…! यशवंतमाची च्या मोहिमेने खंडोजी सारख्या निष्ठ्वान हेराचा बळी मात्र नक्कीच घेतला होता…..एका स्त्रीच्या मोहपाशात कर्तव्य विसरलेला हेर….खंडोजी…! वस्ताद काकांना हुंदके आवरत नव्हते …सखाराम आणि त्यांच्या साथीदारांची मात्र पाचावर धारण बसली होती…….खंडोजी मस्न गेला आहे. तर आम्हाला इथवर आणले तरी कोणी…..भीतीने त्यांचे सर्वाग थरथरत होते….! वस्ताद काकांच्या बोलण्यावरून सखाराम व त्याच्या सवंगड्याना अक्षरश घा...

बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )

Image
🚩  बाजींद भाग - ३७ ⚔️ ▶साऱ्या रायगडच्या काळजात धस्स झाले अशी कठोर शिक्षा खुद्द बहिर्जी नाईकांनी फर्मावली. कडेलोट…… होय…..अश्या फितुरांना स्वराज्यात एकाच शासन….मृत्युदंड. भल्या पहाटेच खंडोजीचे हात मागे बांधून तोंड काळ्या वस्त्राने बांधून त्याला टकमक टोकावर आणले गेले होते. वस्ताद काका स्वता पाठीमागे उभे होत. ज्याला लहानाचे मोठे या हातानी केले, कुस्तीसह हत्यारे शिकवली. हेरखात्यात नोकरी मिळवून दिली अश्या पोराला आज स्वताच्या हाताने मरण द्यायचे होते…. वस्ताद काकांनी बहिर्जी नाईकांना हात जोडून विनवणी केली…. नाईक, माझी आजवरची सेवा चाकरी रुजू धरून एक डाव या खंडोजीला माफी करा. या पोरांन आजवर जीवावरच्या कामगिन्या आपल्या सोबत केल्या आहेत. अशीही यशवंतमाचीसुध्दा स्वराज्यात सामील झाली असताना त्याला इतकी भयानक शिक्षा कशासाठी…? ▶कशासाठी……आज खंडोजीला माफ केले तर हजारो हेर जे स्वराज्यात फिरत आहेत ते सुध्दा स्वार्थापोटी संसार थाटून बसतील वस्ताद काका. साधारण माणसांचे आयुष्य वेगळे आणि स्वराज्याचे हेर खाते वेगळे आहे हे तुम्ही जाणता. इये उठता बसता मरणाशी सामना करत आपण जगतो…आणि आपल्या मुळे महाराष्...

बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )

Image
🚩  बाजींद भाग - ३६ ⚔️ ▶काळभैरवाच्या नांवान चांगभलं……. तलवारीचे घाव एकमेकावर पडू लागले…! मराठे विरुद्ध मराठे लढू लागले. हेच शिवाजी महाराजांना नको होते म्हणून कित्येक वर्षे यशवंतमाचीकडे महाराजांचे दुर्लक्ष होते. पण, परकीय शत्रूपेक्षा स्वकीय शत्रूच जास्त घातक हा अनुभव महाराज सारया आयुष्यभर घेत आले होते. आता निर्वाणीचा क्षण होता. रामराज्य आणायचे असेल तर रावण स्वकीय आहे म्हणून गप्प बसता कामा नये. आज शिर्के विरुद्ध मावळे घनघोर युद्धास प्रारंभ झाला होता. ▶खुद बहिर्जी नाईक या युध्दात होते. कसे काय देव जाणे…आजवर बहिर्जी नाईक प्रत्यक्ष युद्धात फार कमी येत असत. व्यवस्थित पूर्वनियोजन करून देत सारे तेच करत असायचे मात्र हातात तलवार घेऊन लढणे सहसा दिसत नव्हते…! नाईकांच्या युद्धनीतीने मराठ्यांची सेना शिक्यांच्या विरोधात लढत होती. यशवंतमाचीशी वैर करून त्यांच्याच विरोधात भीमा जाधवही लढत होता. पण, या सार्या दंग्यात खंडोजी कुठे होता ? तो तर सर्वात पुढे येऊन लढायला हवा होता. आतातर यशवंतमाधीचा जावई होता तो…. पण, खंडोजी कुठेच दिसत नव्हता…… पण त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ होता…. ...

बाजींद कांदबरी ( बहिर्जी नाईक - एक अज्ञात थोरपण )

Image
🚩  बाजींद भाग - ३५ ⚔️ ▶वस्ताद काकाचे हे बोल ऐकताच सखाराम बोलला.. काका…ही पेटी बघा….आम्ही साधी गरीब लोक…कशाला राजकारणात पडतोय. जे पाहिल. ज्याने है दिल ते तुम्हाला सांगितल…खंडोबाची आन मी खोटे नाही बोलत.. पण काका खंडोजी मेला तर काय त्याचे भूत होत काय आमच्यासोबत…? शक्यच नाही ओ..माणसासारखा माणूसच होता, किती साधा आणि सरळ….. गप्प बसा…..काका ओरडले….. आय माहिती काय आहे खंडोजीबद्दल तुम्हास्नी…..या हातानी लहानाचा मोठा केलाय, कुस्ती शिकवली हत्यारे शिकवली आहेत मी….. पण कर्तव्यापुढे हिंदवी स्वराज्यात कोणालाही मान नाही…. ▶असे म्हणत वस्ताद काका बोलू लागले….. ती रात्र आमच्या आयुष्यातील सर्वात वाईट रात्र होती. जनावरांची भाषा अवगत असणाऱ्या बाजींदच्या तावडीतून प्रत्यक्ष आमच्या बहिर्जीनी जर आम्हाला वाचवले नसते तर आज आम्ही जिवंत नसतो.. जीवना-मरणाच्या दारात आम्ही सारे ज्याच्यामुळे उभे होते तो मस्त लग्नाच्या बोहल्यावर आनंदाने उभा होता..! पण खुद्द बहिर्जी नाईक आमच्या सोबत होते त्यामुळे पुढे महासागर जरी आला असता ती विजय आमचाच होता…. एक राजकारण घडले त्या रात्री….. यशवंतमाचीच्या जगलात गस्तीवर असलेल...
Image
🙏 सर्वाना भाऊबीजेच्या आणि दिपावली पाडव्याच्या शिवमय शुभेच्छा.....!! 🚩 शिवरायांना सख्खी बहिण नव्हती पण स्वराज्यातील प्रत्येक परस्ञी शिवाजी राजाला आपला भाऊ मानत होती .आणि तुम्हाला सांगायची गरज नाही . एकवेळ स्ञीया मुलाच ऐकत नाहीत ...नवर्याच ऐकत नाहीत ....पण भावाच मात्र ऐकतात... शत्रूच्या बाईसाठी.. शिवाजी राजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले. ताई............. ताई ... कोण म्हटले मी तुम्हाला मारणार ... या बाळाला मारणार ... मी तुम्हाला ताई म्हटले म्हणजे हे बाळ माझा भाचा झाला. आज पहिल्यांदा मी माझ्या भाच्याला भेटतोय... काही तरी दिले पाहिजे ना...ताई या बाळाच्या दुधभातासाठी मी ही जिंकलेली गढी त्याला देतोय... आणि आजूबाजूचा प्रदेश तुला चोळी बांगडी साठी..अस म्हणून राजांनी ते बाळ आईच्या हातात दिले. सन्मानाने तीला गादीवर बसवले . तीचा सन्मान केला. काय होतय हे तीला कळत नव्हते . पण मगाशी दुःखाने येणारे आश्रू आता आनंदाने वहायला लागले. राजा.. मी तुला शञू समजले..मी वैरी समजले.. पण तुच भावा बहिणीच नात निर्माण करून या अबलेचा सन्मान केला... धन्य शिवाजी राजा.. धन्य त्याचे माता पिता..................................
Image
▶ लक्ष्मीपुजन आणि नरक चतुर्दशी    या दिवाळीत तुमच्या मनातील लक्ष्मीचे पूजन करा...* लक्ष्मी ही धन- संपत्ती आणि समृद्धीची देवता आहे.  उपजीविकेसाठी आणि जीवनात प्रगती करण्यासाठी एक अत्यावश्यक घटक म्हणून आपल्याला धन संपत्ती मिळालेली आहे.  केवळ पैसा असण्यापेक्षाही जास्त ते बरेच काही आहे. मुबलक प्रमाणात ज्ञान,कौशल्ये आणि कला असणे असा त्याचा अर्थ आहे.  लक्ष्मी ही अशी शक्ती आहे जी आपल्या आध्यात्मिक आणि भौतिक अशा सर्व दृष्टीकोनातून संपूर्णपणे अभिव्यक्त होते. लक्ष्मीचा संबंध लक्ष्याशी म्हणजे ध्येयाशी आहे.  ती अशी शक्ती आहे जी तुम्हाला तुमच्या मूळ स्रोताकडे, म्हणजेच तुमच्या लक्ष्याकडे घेऊन जाते.  ही शक्ती आठ रुपांमधून आपल्यावर कृपेचा वर्षाव करत असते आदि लक्ष्मी म्हणजे मूळ स्रोताची स्मृती.  जेव्हा आपण हे विसरून जातो की आपण या संपूर्ण सृष्टीचाच भाग आहोत तेव्हा आपल्याला आपण स्वत: अगदी तुच्छ आणि असुरक्षित आहोत असे वाटू लागते.  आदि लक्ष्मी हे असे रूप आहे जी आपल्याला आपल्या मूळ स्रोताशी जोडते आणि त्यामुळे सामर्थ्य वाढते आणि मन:शांती मिळते. धनलक्ष्मी हे भौतिक संपत्तीचे रूप आहे.  आणि विद्या लक्ष्मी हे ज्ञ...
Image
☀धनत्रयोदशी (धनतेरस) दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात. धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचा वैद्य ‘धन्वंतरी देवता’ यांची जयंती. या दिनाचे महात्म्य, या दिवशी करायच्या कृतीमागील शास्त्र या लेखातून जाणून घेऊया. 🔹१. तिथी आश्विन वद्य त्रयोदशी 🙏श्री लक्ष्मीदेवी 🔹२. भावार्थ ‘ज्यामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे, त्या धनाची या दिवशी पूजन करतात. येथे ‘धन’ म्हणजे शुद्ध लक्ष्मी. श्रीसूक्तात वसू, जल, वायू, अग्नी आणि सूर्य यांना धनच म्हटले आहे. ज्या धनाला खरा अर्थ आहे, तीच खरी लक्ष्मी ! अन्यथा अलक्ष्मीमुळे अनर्थ घडतो. ☀३. वैशिष्ट्ये 🔹अ. व्यावहारिक हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो; कारण धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मीदेवीचे पूजन केले जाते. 🔹आ. आध्यात्मिक या दिवशी ब्रह्मांडात श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व प्रक्षेपित होत असते. त्यामुळे जिवाला श्री लक्ष्मीदेवी आणि नारायण यांची कृपा संपादन करता येते. ती कृपा जिवाच्या भावावर टिकून राहाते. आताच्या काळात साधकांना शक्तीची आवश्यकता ...

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ⚔

Image
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - ६७ ⚔️ ▶ पायांवरचे एक बिल्वदल उचलले. शांतपणे ते देव्हाऱ्याच्या पायजोत्यावर मस्तक टेकलेल्या जिजाऊंच्याजवळ आले. घोड्यावरचे जिन काढून ठेवावे, तसे राजांनी मन बाजूला सारले आणि राजगडावर शंभूराजांचे 'दिवस' घातले! सारा गडदेव सुतकात पडला. संभाजीराजांच्या मरणाची भूमका बारामावळात पसरली! वाडी-मजऱ्यांतील खोपटांची पाखी हळहळली. 👉 राजांनी राजगडाहून धाडलेला थैलीस्वार शृंगारपूरच्या वेशीत घुसला. डुईची पगडी काढून तो पिलाजी शिर्क्यांच्या वाड्यात दिंडी पार करीत शिरला. “टाकोटाक निघोन येणे. खाजगीने बोलणे आहे.” एवढाच मजकूर राजांनी पिलाजींना लिहिला होता. आता मथुरेला उत्तरी थंडीने फेर टाकला. यमुनेचे पात्र दाटीच्या धुक्याची रजई पांघरू लागले. दिवस राधाकृष्णाच्या मंदिराच्या कळसाएवढा चालून आला, तरी ते दर्शन देत नव्हते. राजांनी मथुरा सोडून दोन महिने हटले होते. दसरा सजून सरला होता. संभाजीराजे वाट बघत होते, थैली घेऊन येणाऱ्या खबरगिरांची. “कोई आया है?” रोज ते स्त्रान, देवदर्शन करून परतताच कृष्णाजीपंतांच्या आईंना - लक्ष्मीबाईंना विचारीत होते. जसे दिवस चाल धरी...