ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

▶️📜 २० फेब्रुवारी इ.स.१६६०
छत्रपती शिवाजी महाराजांनी खारेपाटण जिंकले.
प्राचिन काळी व्यापारी गलबते विजयदुर्गाजवळ वाघोटन खाडीत शिरत व तेथून खारेपाटण ‘‘बलिपत्तन’’ गावापर्यंत येत. येथे जहाजातून माल उतरवून तो बावडा, फोंडा घाटामार्गे देशावर पाठविला जात असे. अशा या प्राचिन बंदराचे, राजधानीचे रक्षण करण्यासाठी खारेपाटणचा किल्ला बांधण्यात आला. इ.स १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी राजापूर पाठोपाठ खारेपाटण किल्ला जिंकून घेतला. राजापूर येथे अटक करण्यात आलेल्या इंग्रज अधिकारी गिफर्ड यास खारेपाटण किल्ल्यातील अंधार कोठडीत ठेवण्यात आले. शिवाजी महाराजानंतर इतर सागरी व खाडीवरील किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचा ताबा कान्होजींकडे गेला, त्यानंतर तुळाजी आंग्रे याच्याकडे खारेपाटण किल्ल्याचा ताबा असताना, इ.स १८ डिसेंबर १७५५ रोजी पेशवे, इंग्रज यांच्या संयुक्त फौजांनी किल्ल्यावर हल्ला करुन तो जिंकून घेतला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 २० फेब्रुवारी इ.स.१६६०
( फाल्गुन वद्य चतुर्थी, शके १५८१, संवत्सर विकारी, सोमवार ) शाहिस्त्या नगरमध्ये!
मराठ्यांना संपवण्याच्या विचाराने निघालेला शाहिस्त्या नगरला पोहोचला व तेथे त्याने छावणी टाकली. त्याची छावणी म्हणजे एक शहरच होते.
महाराज त्यावेळी अफझल वधानंतर आदिलशाही मुलखात प्रचंड दरारा राखून होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 २० फेब्रुवारी १७०७
(काही ठिकाणी ३ मार्च १७०७ अशी तारीख आहे)
रोजी औरंगजेबाचा मृत्यू झाला
औरंगजेब शिवराज्य संपवायला आला, आणि स्वताची कबर त्याला खोदावी लागली. महाराज म्हणायचे, "माझे छोटे-मोठे ३६० किल्ले आज दिमतीला आहेत, एक गड एक वर्ष जरी लढला तरी सर्व स्वराज्य जिंकायला ३६० वर्ष लागतील, मग इतक्या वर्ष आलमगीर तरी जगेल काय" ? अन ते खरे झाले, आलमगीराला याच भूमीत देह त्यागावा लागला.

आपण जेवढे औरंगजेबाचे मोठेपण मान्य करू तेवढे महाराज मोठे होतात. औरंगजेब म्हणायचा," माझे शहजादे, वजीर, सरदार, अमीर-उमराव, सैन्य याच्या पेक्षा एकटे छत्रपती संभाजी राजे माझ्याकडे असते तर मी कधीच झालो असतो आलमगीर पुऱ्या दुनयेचा"...! महाराजांच्या वेळी राजकीय युद्धे होती हे आपण समजून घेतले कि खरे शिवचरित्र समजायला सुरवात होते.

मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जिंकले.
औरंगजेबाच्या पाच लाख सेनासागराशी तब्बल सात वर्षे यशस्वी झुंज देऊन महाराष्ट्र गिळायला आलेल्या औरंगजेबाचे थडगे महाराष्ट्राच्या महाराणीने याच महाराष्ट्रात बांधले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 २० फेब्रुवारी इ.स.१८०२
शिंदेंना इंग्रजांचा तह स्विकारला नाही
इंग्रज वकील कॉलिन्स हा उज्जैन येथे २० फेब्रुवारी १८०२ रोजी पोहोचला आणि मे महिन्यापर्यंत कॉलिन्सचा मुक्काम उज्जैन येथे होता, बडोद्याच्या गायकवाड प्रमाणेच दौलतराव शिंदे यांवरही तैनाती फौजेचा तह करावा म्हणून दडपण वाढत होते, यावेळी कॉलिन्सने दौलतराव शिंदें समोर एक चार कलमी मसुदा मांडला होता पण दौलतरावाने कॉलींस च्या बोलण्याकडे मुळीच लक्ष दिले नाही, शेवटी कॉलिन्स वैतागून मे १८०२ मध्ये शिंदेंच्या दरबारातून परत गेला,त्या अगोदर उज्जैन हून कलकत्ता येते पत्र पाठवले त्या पत्रात असे स्पष्टपणे नमूद केले होते. "दौलतराव शिंदे तर आपले स्वतंत्र गमावणारा तैनाती फौजेचा तह करणारच नाही उलट बाजीराव पेशव्याने अशा प्रकारचा त करू नये म्हणून आपल्या प्रभावाचा पूर्णपणे उपयोग करण्यास तीळ भर ही कसर बाकी ठेवणार नाही,"

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 २० फेब्रुवारी इ.स.१८१८
अखेरचा सेनापती बापू गोखले युद्धात यांचा मृत्यू
अतिशय सत्प्रवृत्त आणि सज्जन असा सेनापती बापू गोखले नावाचा मराठी राज्याचा अखेरचा सेनापती होता. दुसऱ्या बाजीरावानी पळ काढला आणि पुढे पळतच राहिला. १८१८ च्या मे महिन्यापर्यंत पळत राहिला. जेजूरी, पाडली, माहूली, पुसावळे, मिरज, गोकाक(कर्नाटक), पुन्हा माहूली, पंढरपूर, सिद्धटेक असा इंग्रजांची फौज पाठीशी घेऊन पळत सुटला. त्याला साथ देत होता सेनापती बापू गोखले ! धन्याच्या प्रामाणिक सेवेपोटी आणि स्वामिनिष्ठेसाठी ओतूरकडे बाजीराव जात असताना बापू ब्राम्हण वाड्याकडे येऊन राहिला. त्या ठिकाणी बापूचा मुलगा गोविंद तापाने वारला. सगळे दुःख गिळून बापू बाजीरावास साथ देत होता. अखेरीस पंढरपूरजवळ 'गोपाळअष्टी' येथे २० फेब्रुवारी १८१८ रोजी इंग्रजांशी लढताना तो ठार झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 २० फेब्रुवारी इ.स.१८१८
#इंग्रज_आणि_सिंहगड:-
नोव्हेंबर १८१७ मध्ये पुणे जिंकल्यावर इंग्रजांनी धडाधड मराठ्यांचे किल्ले घेण्याचा सपाटा लावला.
सिंहगड आणि आसपासच्या किल्ल्यांचा ताबा घ्यायची जबाबदारी ब्रीगेडीअर जनरल थिओडोर प्रिट्झलरवर सोपवण्यात आली.
ह्या कामगिरीसाठी मद्रास आणि मुंबई रेजिमेंटचे एकूण ४१०० सैनिक त्याला देण्यात आले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments