ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
▶️📜 ५ मार्च इ.स.१६५९
#छत्रपती_शिवरायांच्या_तलवारीचा_खरा_इतिहास
छत्रपती शिवजी महाराजांच्या हातात जी तलवार होती तीच तलवार म्हणे छत्रपती शिवरायांना आई भवानी ने दिली ??
तस काही नाही. शिवरायांनी हिंदूधर्म नुसार शस्त्र पुजन करून तिचे नाव ठेवले भवानी तलवार
तलवारीचा खरा इतिहास असा......
दिनांक ५ मार्च १६५९ रोजी महाराज वाडीचे सावंत यांच्या सोबतीने कुडाळला आले होते , तेथे पोर्तुगाल मध्ये तयार करण्यात आलेली हि तलवार युरोपियन व्यापाऱ्याने विक्रीस ठेवली होती. या तलवारीची खासियत छत्रपती शिवाजी महाराजांनी अचूकतेने जाणली. ती तलवार वजनाने हलकी पण किमतीने बरीच वजनदार होती. ती न गंजणाऱ्या विशेष धातूने बनविली होती. तिचे पाते पातळ असूनही विशेष अश्या न मोडणाऱ्या विशिष्ट पोलादाने बनविण्यात आले होते... अशी हि आधुनिक तलवार हिरेजडीत मुठ आणि सोन्याच्या धातूत तयार केली असल्यामुळे आणखीनच मौल्यवान होती. याशिवाय तलवारीची धार अफलातून होती. तलवारीच्या समोर येणारा क्षणातच आपला प्राण गमाविल अश्या धाटणीची. वजनाने हलकी, धारेने तेज आणि न मोडणारी सपसप वार करू शकेल अशा तलवारीची महाराजांनी खूप गरज होती. त्यावेळी महाराजांनी ती तलवार रोखीने ३०० होणांमध्ये खरेदी केली. (३००होन = त्यावेळचे एक हजार पन्नास रुपये)
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार करताना हिशोब ठेवण्यात अगदी चोख असत याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराजांनी ३०० होण मोजून विकत घेतलेली तलवार, तिची नोंद छत्रपती शिवाजी महाराजांच्या दफ्तर खाण्यात करण्यात आली असून कीर्द खाते (इन्कम अॅन्ड एक्स्पेंडीचर अकौंट) मध्ये खर्चाच्या कॉलममध्ये नोंद करून महाराजांनी या तलवारीबाबाद गोंधळ माजू नये, भाकड कथा रचल्या जाऊ नये यासाठी प्रबंध करून ठेवला आहे...
पण तरीही प्रतीक्रांतीवाद्यानी छत्रपती शिवरायांचे दैवीकरण केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 ५ मार्च इ.स.१६५९
कोकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची घोडदौड चालू असताना आदिलशहाने कुडाळ येथील देसाई लखम सावंत यांची बंडखोरी मोडून काढण्यासाठी रुस्तुमजमा नावाच्या सरदारास पाठवले. लखम सावंताने निकराचा प्रतिकार करून आपले रक्षण करण्याचा प्रयत्न केला परंतु रुस्तुमजमाने सर्वत्र नाकेबंदी करून लखम सावंताची परिस्थिती बिकट केली. या संकटाला तोंड देण्यासाठी आजच्या दिवशी महाराजांशी तह करून महाराजांचे मांडलिकत्व पत्करले व तहाप्रमाणे महाराजांनी लखम सावंताला मदत करून त्याचे संरक्षण केले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि कुडाळकर सावंतांमधील तहनामा -
ता. ५ मार्च १६५९
श्री
सन १०६८ फसली
तहनामा राजश्री खेम सावंत व लखम सावंत देसाई बहादूर प्रांत कुडाळ यांजकडील पीतांबर शेणवई कारभारी येऊन ठराव करून दिला सुरु सन तिस्सा खमसैन अल्लफ
प्रांत मजकूरचे महाल वगैरे चालत आहेत. आकार होईल त्याचा ऐवज दरसाल निम्मे हुजूर पावता करावा, निम्मा आकार राहील त्यांत तीन हजार लोक पायदळ हेटकरी ठेवावे आणि ज्या वेळेस हुजूर चाकरीस बोलाविले जातील तेव्हां तीन हजार लोकांनिशी सेवा करावी. खांसा जातीने येण्याचे प्रयोजन पडेल तेव्हां बोलावणे होईल तेव्हां येत असावे. कलम १
किल्ले फोंडे प्रांत तालुका घेऊन हुजर ठेविला त्यास हरएक प्रसंगास कुमक राखीत जावी. बिदनूर वगैरे संस्थानच्या खंडण्या घेण्यास स्वारी होईल त्यांच्या कुमकेस जात असावे. कलम १
स्वराज्य साधनाच्या ठायी वकीलापाशी मध्ये राहून तुरुक लोकांचे साधन करावे. कलम १
प्रांतांतील जमाबंदीच्या चौकशीस हुजुरून कारकून व लोक राहतील ते ठेवून त्यांच्या नेमणूकीबद्दल हुजूर अमल पैकी पावते करावे. कलम १
प्रांत मजकूरची देशकत वतने तुमची व बहादूर किताब अजरा [ मऱ्हा ] मत चालेल. त्यांतील किल्ले, कोट व ठाणी तुमच्या स्वाधीन केली आहेत. तेथे दस्तान करून जतन करावी. तेथे हुजूरचे कारकून व लोक येतील ते ठेवावे. कलम १
शके १५८० विलंबीनामसंवत्सरे फाल्गुन वद्य ७. एकूण पांच कलमे करार करून तहनामा दिला असे " मोर्तब. "
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ ५ मार्च इ.स.१६६६
औरंगजेबाच्या भेटीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे राजगडाहून आग्र्याकडे प्रस्थान.त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत, मदारी मेहतर.आऊसाहेबांची मनस्थिती आज काय असेल ? केवळ कल्पनाच केलेली बरी ! शिवाजी महाराज आज मृत्यूच्या दाढेत प्रवेश करायला निघत होते, ९ वर्षाच्या युवराजांसह !!!
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 ५ मार्च इ.स.१६७३
कोंडाजी फर्जंद व आनाजी दत्तो या मंडळिंनी गुप्तपणे हेरगिरी करून पन्हाळ्याची सारी माहिती मिळवली, छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पन्हाळ्याचा विडा अवघ्या साठ मावळ्यानीशी कोंडाजी फर्जंद यांना दिला आणि ती रात्र आली. ज्या रात्री पन्हाळ्यात शिरकाव करून पन्हाळा घेण्याचा मनसुबा पार पडणार होता
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 ५ मार्च इ.स.१६७६
बंगलोरास राहून शहाजीराजे आपल्या कर्नाटकातील जहागिरीचा कारभार पाहत होते. तंजावरचे राज्य प्रथम शहाजी राजांनी विजापूरच्या तर्फेने १६५९ च्या मार्चमध्ये जिंकले. तेव्हापासून दोन वर्ष तो प्रदेश शहाजीराजांच्या ताब्यात होता. त्यानंतर विजापुरी लष्करात तंटे होऊ लागल्यामुळे शहाजी राजे तंजावर सोडून बंगलोरास आले. शहाजी राजांची पत्नी तुकाबाई यांनी एकोजी राजे नावाच्या मुलास जन्म दिला (१६३१). एकोजीराजे अतिशय शूर व कर्तृत्ववान होते. बहुश्रुतही होते. वडलांच्या मृत्यूनंतर बंगळूरच्या जहागिरीची मालकी एकोजीराजाकडे आली. शहाजी राजांचे पहिले कारभारी नारो त्रिमल हणमंते होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा पुत्र रघुनाथ नारायण हणमंते हे शहाजीराजांचा कारभार पाहू लागले. एकोजी राजे विजापूर दरबारची चाकरी इमाने इतबारे करीत होते. दरबारच्या हुकूमावरून एकोजी राजानी मदुरेच्या चोक्कनाथ नायकाचा पराभव केला व तंजावर शहर जिंकले (दिनांक १२ जानेवारी १६७६). तंजावर ही विजयराघव राजाची राजधानी होती. एकोजीच्या मनांत शिवाजी महाराजांसारखे आपणही स्वतंत्र राजा होऊन राज्याभिषेक करवून घ्यावा असे होते. त्याप्रमाणे एकोजी राजांनी समारंभपूर्वक तंजावरात सिंहासनारोहण केले. (दिनांक ५ मार्च १६७६) तदनंतर कारभारी रघुनाथ नारायण हणमंते यांजकडून एकोजीराजे यानी कारभार काढून घेतला. हलके आणि सामान्य लोकांना जवळ करून त्यांच्या तंत्राने ते वागू लागले. तेव्हा रघुनाथपंत महाराष्ट्रात शिवाजी महाराजांस भेटावयास आले ते कर्नाटकांतील राज्य विस्ताराची मौल्यवान राजकारणे घेऊन. रघुनाथपंत साताऱ्यास आले कारण महाराज सातारा किल्ल्यावर विश्रांती घेत होते. महाराजांना भेटले. काही दिवसांनी ते पन्हाळ्यास महाराजांबरोबर गेले व त्यांजबरोबर ते रायगडास जून १६७६ च्या प्रारंभी आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 ५ मार्च इ.स.१६७७
(फाल्गुन शुद्ध एकादशी, शके १५९८, संवत्सर नल, वार सोमवार)
महाराजांनी मादण्णापंतांच्या मातोश्रींची भेट घेतली.
महाराजांना मादण्णापंतांनी आग्रहाने आपल्या घरी नेले. आकण्णापंत व मादण्णापंत यांच्या मातोश्री भागम्मादेवी यांनी स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून महाराजांना भोजन वाढले. महाराजांच्या महत्वाच्या मुत्सद्दयांनाही भोजनार्थ निमंत्रित केले गेले होते. त्याचबरोबर साऱ्यांचा अलंकार, वस्त्रे, घोडे देऊन आकण्णापंत व मादण्णापंत यांनी सत्कार केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 ५ मार्च इ.स.१७७८
कोल्हापूरकरांचा तह
फेब्रुवारीमध्ये सटवाजी भोसले यांनी ५०० घोडेस्वार घेऊन थेट महादजीच्याच चौकीवर हल्ला चढवला. त्याठिकाणी उदाजी पवारांचा नातू मल्हारराव पवार होता. सटवाजींच्या पट्ट्याच्या घावात मल्हाररावाच्या नाकाचा शेंडा उडाला. महादजीची सात माणसे जागीच ठार झाली. वेळ पाहून सटवाजी फौज घेऊन शहरात परतले. शेवटी ५ मार्च रोजी महांकाळी तोफ कराड येथे येऊन पोहोचल्याचे वर्तमान महादजीस समजले. गेले तीन महिने कोल्हापूरास वेढा पडला होता. अतोनात जिवीत व वित्तहानी झाली होती. इकडून हैदर अलीचीही फौज अजून आली नव्हती. त्यात महांकाळी तोफ कोल्हापूरात पोहोचल्यास तटबंदी टिकाव धरु शकणार नाही हे ओळखून सेनापती येसाजी शिंद्यांनी महादजीच्या अटीवर तह करण्याचे कबूल केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 ५ मार्च इ.स.१८७९
१८७९ नंतर फडके यांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी दौलतराव नाईक यांच्या मदतीने लोणी जवळ धामरी गावावर पहिला दरोडा टाकला. यामध्ये त्यांना फक्त तीन हजार रुपये मिळाले. त्यानंतर फेब्रुवारी १८७९ मध्ये लोणी व खेडवर दरोडा टाकून लूटमार केली. ५ मार्च १८७९ रोजी जेजुरी जवळ वाल्हे गावावर दरोडा टाकला. या लुटीत त्यांना चार बंदुका, तीनशे रुपये व शंभर रु. चे कापड मिळाले. यानंतर त्यानी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी पुणे, मुंबई व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment