ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 २४ एप्रिल इ.स.१६२८
शाहजहानने खानजहानच्या जागी दक्षिणेचा सुभेदार म्हणून महातबखानाची नेमणूक केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २४ एप्रिल इ.स.१६७४
(चैत्र वद्य चतुर्दशी, शके १५९६, संवत्सर आनंद, वार शुक्रवार)
छत्रपती शिवाजी महाराजांनी केंजळगड स्वतः छापा घालून काबीज केला. वास्तविक पाहता दोन महिन्यांनी त्यांचा राज्याभिषेक होणार होता. त्यांनी स्वतः या छाप्यात सहभागी होणे टाळता आले नसते का ? पण त्यांनी तसे केले नाही व जिजाऊ साहेबांनीही त्याला विरोध केला नाही. स्वतः महाराजांनी या हल्ल्याचे यशस्वी नेतृत्व केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २४, एप्रिल इ. स. १६८३,
(वैशाख शुद्ध अष्टमी, शके १६०५, रुधिरोद्रारी संवत्सर, वार मंगळवार)
सुरतकर इंग्रजांनी लंडनला लिहीलेल्या पत्राची नोंद!
या पत्रातून औरंगजेब बादशहाने भिवंडीची सेना काढून घेतली असा उल्लेख सापडतो. अशा तऱ्हेने कल्याण-भिवंडीच्या मोहीमेत छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेब बादशहास मराठी बाण्याचे दर्शन घडविले आणि ही मोहीम चुरगाळून टाकली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २४ एप्रिल इ.स.१७००
छत्रपती राजाराम महाराज निवर्तल्यावर परशुरामपंताने व सुभानजी भांडवलकर या सातारा किल्लेदारांनी अजिंक्यतारा किल्ला लढवला पण नाईलाजाने मोगलांशी तहाची वाटाघाटी केली. शहाजाद्याच्या साहाय्याने या वाटाघाटीस औरंग्याने मान्यता दिली व किल्ल्यावरील लोक उतरून किल्ला मोगलांचे हवाली केला. किल्ल्याचे नाव २४ एप्रिल १७०० रोजी अजमतारा असे ठेवण्यात आले. छत्रसाल राठोड तेथे किल्लेदार म्हणून नेमण्यात आला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २४ एप्रिल इ.स.१७३९
"वसईचा पाठीराखा... जंजिरे धारावी"
साष्टीचे उत्तर टोक म्हणजे धारावी. वसई किल्याच्या समोरील खाडीच्या दुसर्या तीरावरील लष्करी दृष्ट्या अत्यंत मोक्याचे ठिकाण म्हणजे धारावी. मराठा सरदार धारावीचे लष्करी महत्व किती जाणत होते ते त्यांनी चिमाजीअप्पांना लिहिलेल्या पत्रांतून स्पष्ट होते. पत्रांतील मजकूर पुढीलप्रमाणे - "धारावी समुद्रामुळें व बंदरामुळें दुसरा जंजिराच! शिवाय दाणागल्ला तेथून चांगला लवकर वसईस पोचवितां येतो. शिजले अन्न निवलें नाही तोंच तेथे पोचवितां येतें." "सर्वांच्या विचारें, धारावीस ठाणे बसवून खाडी बंद होते तरच शत्रूचा आटा व गलबते बंद होतील." "धारावीची बंदिस्त म्हणजे बंदोबस्त पाथरवट आणून चहुबुरूजी आधीं सत्वर बांधवावी मग पुढें मोठा कोट बांधवावा तेंव्हाच कार्यास येईल." - शंकराजीपंत फडके.
"धारावीवर मोर्चा हजार माणसांचा ठेवून वसईवर इभ्रत पाडावी." - बरवाजी तापकीर
मराठा सरदारांच्या या अभिप्रायानंतर चिमाजीअप्पांच्या फौजेने त्वरीत १७३७ च्या मध्यात "धारावी" हे ठाणे हस्तगत केले.
१९३९ च्या सुरुवातीला मराठ्यांनी माहीम काबीज केल्यानंतर खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांजवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
चिमाजीअप्पांनी तुबाजीस मुर्ध्यावर मोर्चा बसविण्यास आज्ञा केली. तुबाजीपंतांचा मुर्ध्यावर २२ फेब्रुवारी १७३९ मोर्चा कायम झाला. इतक्यात पोर्तुगीजांनी त्यावर हल्ला केला. तुबाजीपंताच्या फौजेने पोर्तुगीजांचा हल्ला निकराने परतविला. इतकेच नाही तर २६ फेब्रुवारी १७३९ रोजी गायमुखावर तुबाजीपंतांनी मोर्चा बसविला. धारावी किल्यात पाण्याची सोय नाही. गायमुख मराठ्यांनी काबीज केल्याने पोर्तुगीजांचे पाणी तुटले. पोर्तुगीजांनी पुन्हा गायमुखावर हल्ला केला तोही मराठ्यांनी परतवून लावला २७ फेब्रुवारी १७३९ रोजी चिमाजीअप्पांनी शत्रूच्या आरमारावर गायमुख येधून हल्ला करण्यास हुकूम दिला. त्यानुसार रामजी महादेव, तुबाजीपंत व आंग्रे यांनी मारा सुरू केला.
३ मार्च १७३९ रोजी धारावीच्या पूर्वेकडील भागात तुबाजीपंत, डोंगरीकडील भागात नारोजी कडू व खंडू गोमाजी, पश्चिमेकडील भागात गोविंद हरी पटवर्धन व खंडोजी माणकर यांनी प्रबळ मोर्चे लावून गावाची नाकेबंदी केली. या मोर्चांवर पोर्तुगीजांकडून मारा होत होता पण मराठ्यांनी हे हल्ले परतवून नाकेबंदी कडक केली. अखेरीस मराठ्यांनी तोफांचा मारा केला, सर्व भिंताडे जमीनदोस्त केली, पाणी अगोदरच तोडले होते. २४ एप्रिल १७३९ रोजी कौल घेऊन पोर्तुगीजांनी मराठ्यांसमोर शरणागती पत्करली. पोर्तुगीजांचा एकूण एक सैनिक जखमी झाला होता. मुख्य अधिकार्यांपैकी मार्टिन आणि अल्फेरिस एस्तव्हो मार्टिन्स हे दोन अधिकारी ठार झाले.
अशा रीतीने धारावी २४ एप्रिल १७३९ काबीज झाली. वसईची चावी हातात आल्यानंतर लगेचच उत्तर फिरंगाणातील पोर्तुगीजांची जणू राजधानी वसई मराठ्यांनी काबीज करून पोर्तुगीज सत्ता उत्तर फिरंगाणातून उखडून काढली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜२४ एप्रिल इ.स.१७५२
मोगल बादशहाने कन्होज येथे मराठ्यांशी दिल्लीच्या संरक्षणासाठी तह
या तहा मुळेच पानिपतचा महासंग्राम झाला, मराठा आणि अफगाण यांच्यात युद्ध झालं. वास्तविक मराठा आणि अफगाण ह्यांच्यात वैर नव्हतं, मराठी साम्राज्याच्या व अफगाणी साम्राज्य एकमेकांपासून कोसोदूर, मग ह्यांच्यात युद्ध का झालं;
कारण दि. २४ एप्रिल १७५२ रोजी, तत्कालीन मोगल
बादशहा याने, कन्होजयेथे मराठ्यांशी दिल्लीच्या संरक्षणासाठी तह केला, त्याबदल्यात मोगल बादशहाने मराठ्यांना खालील गोष्टी दिल्या होत्या :
(१) ५० लक्ष असरफिया दरवर्षी,
(२) अजमेर व आग्रा ही दोन शहर महसूल म्हणून दिले,
(३) सगळ्या मोगल प्रांतावर चौथाई दिली.
म्हणून अफगाणांचा पाडाव करण्यासाठी आणि "राष्ट्राच्या सौरक्षणासाठी" मराठयांनी अब्दालीशी युद्ध केलं होतं.
🚩 अहमदशहा अब्दालीला भारतात कोणी बोलविले ?
मराठ्यांच वाढतं वर्चस्व पाहून, भारतीय उपखंडा तील रोहिलाखंडाचे शासक 'नजीबखान', जयपूरचा राजा माधवसिंह, ह्यांनी दिल्लीची ५ व्यांदा लूट करण्यासाठी, परिणामी मराठ्यांचाही पाडाव होईल, हे इच्छुन अब्दालीला भारतात येण्याचे आमंत्रण दिले.
🚩 अब्दालीचे दिल्लीवर स्वारी करण्याचे प्रमुख कारण : -
सन १७५८ पर्यंत , स्वराज्याच्या सीमा ह्या उत्तरेकडे, अटक, लाहोर, मुलतान, आणि पेशावरला पोहोचल्या. जवळच अब्दालीच्या राज्याच्या सीमा होत्या, एकप्रकारे भविष्यात अहमदशहाला आव्हानच होते, त्यामुळेच अब्दालीने दिल्लीवर स्वारी करून मराठ्यांवर मात करण्याचे ठरविले असेल.
🚩 अब्दालीचा काबूल ते हिंदुस्थान प्रवास : -
काबूल - जालनाबाद - पेशावर - लाहोर - पंजाब - अनुप शहर.
जुलै १७६० रोजी, अहमदशहा अब्दाली उत्तरप्रदेशातील
अनुप शहराजवळ पोहचले. अब्दाली कडे एक मोठं लष्कर होतं आणि प्रभावी तोफखाना होता.
🚩 मराठ्यांचा दक्षिणेतून उत्तरेकडे प्रवास : -
काबूलच्या अब्दालीचा पराभव करण्यासाठी, पेशव्यांनी (नानासाहेबांनी), एक मोहीम आखली, आणि या मोहिमेच नेतृत्व शूरवीर व राजनीतीधुरंधर श्रीमान सदाशिवरावभाऊ यांना दिलं . दि. ७ मार्च १७६० ला, सदाशिवरावभाऊ ४८ हजार फौझेसह, फ्रेंच्याच्या आधुनिक तोफखान्यासह आणि विश्वासू सरदारांसह दिल्लीच्या सौरक्षणासाठी निघाले. मार्गात सैन्य जमा होत होतं.
🚩 मराठ्यांची पडती बाजू : -
मराठ्यांच्या लवाजम्यात, ५० हजार इतर लोकं म्हणजे सैन्याचा कुटुंबकबिला, बाजार-बुंदगे होते. मराठयांनी रसद पुरेशी बरोबर घेतली नव्हती, मोहीम खर्चासाठी २० लाखाची गरज होती आणि बरोबर फक्त ६ लाखच घेतले होते. उदगीर ते दिल्ली जवळपास १००० मैल होते आणि आहे.
🚩 मराठ्यांचे प्रमुख सरदार : -
या नवीन मोहिमेसाठी, नेतृत्व तर सदाशिवरावभाऊंकडे होते आणि या मोहिमेचा संपूर्ण कारभार नानासाहेब पेशव्यांनी, आपला पुत्र विश्वासरावास दिला होता.
(१) मल्हारराव होळकर
(२) सुरजमल जाट
(३) विठ्ठल शिंदे
(४) इब्राहिम गारदी (मराठ्यांचा तोफप्रमुख)
(५) समशेर बहाद्दर
(६) अंताजी माणकेश्वर
(७) यशवंतराव पवार
दि. २ जून १७६० रोजी, मराठे ग्वालीयरला
पोहोचले. पुढे मराठे धवळपुरा, मथुरा असे अंतर पार
करत, मराठे दिल्लीला पोहोचले. गारद्यांच्या तोफांमूळे
दिल्ली सहजरीत्या मराठ्यांच्या ताब्यात आली. दिल्ली
सहज मराठयांनी जिंकल्यामुळे अब्दालीही हबकला;
परंतु नजीबखान अब्दालीचे सांत्वन करत होता. या मध्ये
नजीबखान एक गोष्ट करत होता, अब्दालीविरुद्ध मराठ्यांना कोणीही चांगला शासक न मिळून देणे. त्यावेळीएक शासक असा होता, शुजाउद्दोला. हा ज्या पक्षात जाईल त्या पक्षाची स्थिती मजबूत होईल, सैन्यबळ व रसद वाढेल. दोन्ही पक्षांनी आपापले प्रयत्न सुरू केले ,परंतु यश मात्र नजीबखानामुळे अब्दालीस मिळाले, शुजाउद्दोला अब्दालीस जाऊन मिळाला.
🚩 अगर नजीबखान न होता, तो पानिपत न होता |
मराठ्यांना आर्थिक चणचण भासू लागली, तेव्हा दिल्ली मधील, दिवाण-ए-खास ह्या दरबारातील छता वर लावलेली चांदी, भाऊंनी काढावयास सांगितली, व त्याची नाणी पाडली, त्यातून काही दिवस खर्च भागला.
१ सप्टेंबर १७६०ला, सदाशिवरावभाऊंनी
नानासाहेबांना पत्र लिहिले, त्या पत्रात भाऊ म्हणतात,
"माझ्या छावणीत भूकमरी आहे, पैसे नाही आहेत,
कर्जही मिळत नाही व माझे शिपाई उपवास करत
आहेत, लवकरात लवकर मदत पाठवावी".
दिल्ली जिंकल्यामुळे, अब्दालीच्या छावणीत भीतिदायक वातावरण निर्माण झालं आणि अहमदशहाअब्दाली, नजीबखान व शुजाउद्दोला यांनी दिल्लीकडे कूच केलं. अब्दाली आपल्या सैन्यासह, यमुनेच्या एका बाजूस शहादऱ्याजवळ तळ ठोकून होता, तर मराठे यमुनेच्या दुसऱ्या बाजूस दिल्लीत होते.
🚩 कुंजपुऱ्यावरील अधिपत्य :-
ऑक्टोबर १७६० मध्ये, मराठ्यांनी कुंजपुरा लुटले, कुंजपुरा मध्ये १५ हजार अफगाण होते, १६ ऑक्टोबर ला मराठ्यांनी कुंजपुराला वेढा घातला. इब्राहिम खानाने, कुंजपुरावर तोफांचा मारा केला. दुसऱ्याच दिवशी युद्ध झालं, मराठयांनी ८ हजार अफगाण कापले काहीच अवधीत उर्वरीत ४ हजार अफगाण तोंडात गवत घालून बाहेर आले. समादखान, कुतुबशहा हे कुंजपुऱ्याच्या किल्ल्यात मराठ्यांना सापडले, यांनी जसं सरदार दत्ताजी शिंदे यांना जसं मारलं होतं, तसंच महादजींनी त्यांना ठार मारले. कुंजपुरा मराठ्यांच्या अधिपत्याखाली आल्यामुळे, मराठ्यांना धन मिळाले आणि १० हजार खिंडी गहू व उपयुक्त खाण्याचेसामान मिळाले आणि दारूगोळाही मिळाला; यामुळे मराठ्यांची खाण्याची अबाल टळली. पुढे मराठे कुरुक्षेत्रावर गेले. कुरूक्षेत्राकडे जाण्यापूर्वी कुंजपुरा, हा गोविंदपंत बुंदेले यांच्या ताब्यात दिला होता.
🚩 यमुनेचा पूर आणि अब्दालीची प्रबळ महत्वकांक्षा : -
अब्दाली सर्व सैन्यासह, दि. २३ ऑक्टोबर
१७६० रोजी, रात्री यमुनेच्या किनाऱ्यावर पोहचला.
दुसऱ्या बाजूस भाऊंनी ३ हजाराची फौज ठेवली होती.
यमुनेचं पाणी खूप अधिक प्रमाणात होत, दि. २७ ऑक्टोबरला अब्दालीने अगदी सहज यमुना नदी, त्याच्या सर्व सैन्यासह पार केली. भाऊंना ही खबर, हेरांनी लगेचच कळविली, इतक्या कमी वेळेत अब्दाली नदी पार करेल हे भाऊंनी ठरविलच नव्हतं, "आता अब्दाली भाऊ आणि दिल्ली यांच्यामध्ये येऊन, सैन्यासह थांबला". पुढे भाऊ लवकरात लवकर दिल्लीकडे यावयास निघाले. पुढे भाऊ, आपल्या फौझेसह पानिपता जवळ आले. (यमुना नदी अब्दालीने गुलाबसिंग गुजर या स्थानिक मनुष्याच्या मदतीने ओलांडली.)
🚩 पानिपत : -
नोव्हेंबर १७६० ला दोन्ही पक्ष पानिपतच्या विस्तीर्ण रणांगणात आले होते. मराठयांनी आपल्या बाजुने १० फूट खोल खंदक तयार केले आणि माचे बांधले. दोन्ही पक्ष एकच काम करत होते, एकमेकांची रसद तोडत होते. मेरठमध्ये, गोविंदपंत बुंदेलेंच्या सेनेने अब्दालीची रसद मारायला सुरुवात केली, हा आदेश भाऊंनीच दिलेला होता ! अब्दालीने अताईखानास , कुंजपुरावर चालून गेला, कुंजपुरा ताब्यात घेतला आणि नंतर मेरठ जवळील एका गावात जेतसिंह गुजरांच्या (ह्याने पंतांस सांगितले , की मी तुम्हांस खंडणी देतो, त्यामुळे पंत थांबले, गुजरने अताईखानास ही बातमी पाठविली, अताईखान गोविंदपंतांवर चालून आला) फितूरीमुळे गोविंदपंत बुंदेले याना खानाने पकडले, खानाने पंतांची अमानुष हत्या केली. कुंजपुरा ताब्यात घेऊन, अब्दालीने मराठ्यांची रसद तोडली. आता नोव्हेंबर व डिसेंबर मध्ये मराठ्यांच्या छावणीत भुखमरी झाली, लोकं मरायला लागली. हजारोंच्या संख्येत माणसं व जनावर मेली, बिमारी निर्माण झाली. जानेवारी महिना उगविला, ३ दिवसातून एकदाच जेवण मिळत असे. आलासिंग जाट, पटीयाला संस्थानाचा प्रमुख हा मराठ्यांना रसद पाठवीत असे. अब्दालीला रसद ही रोहिलखंड व अवध या प्रदेशातून येत होती. (अताईखानाने गोविंदपंतांच शीर कलम केलं, आणि अब्दालीकडे पाठविले, पुढे अब्दालीने ते शीर सदाशिवभाऊंकडे पाठविले व एक पत्र पाठवून दिले, त्या पत्रात अब्दाली म्हणतो, "तुमचं स्वागत करण्यासाठी हा वरती
गेला आहे , तुम्हालाही तेथेच जायचं आहे". हा प्रसंग, २० डिसेंबर १७६० रोजी घडला. नंतर भाऊंनी, पंतांच्या मस्तकावर व्यवस्थितपणे अंत्यसंस्कार केले.)
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २४ एप्रिल इ.स.१८१८
कर्नल मॅक्डोवेल याला त्र्यंबकगड घेण्यात यश, त्या आधी दोनच दिवस म्हणजे २२ एप्रिल १८१८ त्याला त्र्यंबकगड घेण्यात अपयश आले होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment