ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष  ⛳

📜 १ मे इ.स.१६६०
स्वराज्यावर चालून आलेला मुघल सरदार शाहीस्तेखान सासवडहून राजेवाडीला आला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १ मे इ.स.१६६५
दाऊदखान शिवापुरास आला!
           दाऊदखानाचे सैन्य किल्ले राजगडाच्या पायथ्याशी पोहोचले पण येथे महाराजांच्या समोर त्यांची मात्रा चालली नाही. किल्ले राजगडावरून तोफा, बंदुका आणि बाणांचा जबरदस्त मारा सुरू झाला. किल्ले राजगडाच्या पद्मावती माचीवरही मराठे युद्धाच्या पावित्र्यात जय्यत तयार होते. किल्ले राजगडाचा दुर्गम डोंगराळ टापू मराठ्यांच्या मदतीला होता. डोंगरांच्या मदतीने किल्ले राजगड चांगलाच भांडता. मराठ्यांच्या रेट्यापुढे मोगली सैन्य टिकेनासे झाले. अखेर दाऊदखान २, दोन कोस माघारा हटला. त्याने आपला तळ गुंजण घेऱ्याजवळ दिला व दुसऱ्या दिवशी शिवापुरला आला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १ मे इ.स.१६६५
पुरंदरचा सफेद बुरूज स्फोटात उडाला. माची पुरंदर मोगलांच्या ताब्यात. पुरंदरचा बालेकिल्ला दिलेरखानाशी व मिर्झाराजांशी झुंजू लागला. वज्रगड व माची पुरंदर मोगलांच्या ताब्यात असल्यामुळे दोन्हीकडूनही पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर एल्गार सुरू झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १ मे इ.स.१६७५
फोंड्याच्या २ दोन माऱ्याच्या जागा मराठ्यांच्या ताब्यात!
           कुडाळ वरून महाराज फोंड्यावर चालून गेले. रुस्तमेजमानचा पुत्र महमदखान हा फोंड्यावरून महाराजांशी सलोख्याचे अटितटीने झुंजू लागला. युद्धाच्या धुमश्चक्रीत दोन्ही बाजूंची बरीच प्राणहानी होऊ लागली. महाराजांनी ४, चार वेळा फोंड्याला सुरूंग लावले पण महमदखानानेही तेवढेच सुरूंग लाऊन महाराजांना प्रत्युत्तर दिले. अखेर महाराजांनी तटापासून १२ फुटांवर सैनिकांसाठी संरक्षक भिंत बांधली व फोंडा घेण्याचा निर्धार करून, (दि. ८ एप्रिल इ.स.१६७५ रोजी २ हजार घोडदळ व ७ हजार पायदळानिशी फोंड्याला वेढा दिला. पावसात देखील वेढा सुरू ठेवण्याचे महाराजांनी ठरविले. महाराज स्वतःही फोंड्यालाच तळ ठोकून बसले होते. त्यांनी आपल्या सैन्याच्या वेगवेगळ्या तुकड्या करून त्यांना आदिलशाही हद्दीतील एटगिरी व गोवलकोंड्याच्या हद्दीतील २ शहरांकडे लुट करण्यासाठी रवाना केले. मराठ्यांनी सर्व ठिकाणी प्रचंड लूट करून ती सर्व संपत्ती व काही कैद केलेले सावकार फोंड्याला महाराजांजवळ आणले. पोर्तुगीज गुप्तपणे महमदखानाला मदत करत होते. त्यांची कुकली व वरुडे ही गावेही मराठ्यांनी लुटली. महमदखानाजवळ फक्त ४ महिने पुरेल एवढीच रसद होती. त्याच्या कुमकेस रुस्तमेजमान १५ हजार पाचशे घोडदळ व काही पायदळ घेऊन आला. महमदखान नेटाने तोंड देत होता. महाराजही चिवटपणे वेढा घालून बसले होते. फोंड्याच्या २ माऱ्याच्या जागा मराठ्यांच्या ताब्यात आल्या.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १ मे इ.स.१७३९
१ मे रोजी नादिरशहाने मोठा दरबार भरवून महमदशहास दिल्लीच्या तख्तावर बसविले आणि सुमारे एक अब्ज रुपये एवढी संपत्ती आणि सिंधू नदीच्या पश्चिमेकडील प्रदेश आपल्या ताब्यात घेऊन जाताना सुप्रसिद्ध मयूर सिंहासन व कोहीनूर हिरा घेऊन तो इराणला परत गेला. नादिरशहाच्या स्वारीमुळे दिल्लीत हाहाकार उडाला. त्यावेळी मराठ्यांचा वकील बाबूराव मल्हार हे जयपुरास  गेले. तिथून त्यांनी पेशव्यास पत्र लिहिले ते असे “चकतियांची पातशाही बुडाली, इराणी जाली, यास्तव सवाईजीनी आपले व लोकांचे कबिले उदेपुरास पाठवून सडे जाले आहेत. इकडील दक्षिणच्या मातबर फौजा जातील तेव्हा नादिरशहाशी प्रसंग पडेल”. यावरून बादशहास मदत करून नादिरशहास घालवून द्यावा अशी मराठा मंडळाची इच्छा होती. छत्रपती शाहू महाराजांनी व श्रीमंत बाजीराव पेशवे यांचाही हाच बेत ठरला. मोगली फौज जमा करून नादिरशहा दक्षिणेत येणार अशी बातमी आली. तेव्हा वसईची मोहीम आटोपताच श्रीमंत बाजीराव पेशवे आपल्या सरदारासह त्याजवर निघाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १ मे इ.स.१७७३
इंग्रज आणि पेशव्यांच्यात पुरंदरचा तह झालेला पाहताच फ्रेंचांनाही पेशव्यांशी सलोखा व्हावा असे वाटू लागले. फ्रेंचांनी आपला वकील ल्युबिन्सन बाला पुण्यात पाठवले.‌ ल्युबिन्सनने नानांची सन्मानाने भेट घेतली. १ मे १७७३ नंतर लगेच नानांनीही त्याची चांगली बडदास्त ठेवली. पेशवे आणि फ्रेंचांमध्ये तह आणि सलोखा निर्माण झाल्याचे पाहताच इंग्रज चिडले. कारण याच सुमारास अमेरिकेत तिथल्या नेटीव्ह लोकांचे फ्रेंचांच्याच मदतीने इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध सुरू होते. तसंही पेशव्यांशी झालेला तह इंग्रज कधी ना कधीतरी मोडणारच होते. गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्ज याने ताबडतोब पेशव्यांविरुद्ध झुंज घेण्याची तयारी चालवली. एकंदरीतच या साऱ्या प्रकरणात नाना फडणवीसांना आता अधिकाधिक महत्त्व प्राप्त होऊ लागले होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १ मे इ.स.१८१८
प्रचंड तोफांचा मारा करून मेजर एल्ड्रिजने चावंड किल्ला जिंकला आणि तो नाणेघाटाच्या म्हणजेच जीवधनच्या दिशेने निघाला होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १ मे इ.स.१८१८
रायगडावर इंग्रजांनी १ मे १८१८ या दिवशी हल्ला चढवला. कॅप्टन प्रॉथर हा नेतृत्व करीत होता. या वेळी गडाचा किल्लेदार होता अबुल फतेखान. आपलं सारं बळ एकवटून तो गडावरचा भगवा झेंडा सांभाळत होता. मराठे इंग्रजांना इरेसरीने टक्कर देत होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १ मे इ.स.१९६०
"महाराष्ट्र दिन"
अखंड संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मीतीसाठी १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिल्यानंतर आजच्या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments