ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 ३ मे इ.स.१६७०
पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले एका पाठोपाठ परत जिंकून घेण्याचा मराठ्यांनी सपाटा सुरु केला व त्यात ३ मे रोजी मावळातला "किल्ले लोहगड" मराठ्यांच्या ताब्यात पुन्हा आला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
📜 ३ मे इ.स.१६८०
मुंबईकर इंग्रजांच्या पत्राची नोंद!
. "मुंबईकर इंग्रजांच्या पत्रात छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या नावाची ग्वाही फिरवून ते वडिलांच्या गादीवर बसले असे लिहीले आहे मोरोपंत, अण्णाजीपंत वगैरे, महाराजांचे हुकूम घेण्याकरिता पन्हाळ्यास गेले आहेत. युवराज राजाराम किल्ले रायरीला आहते. ते तेथेच राहणार असून तो किल्ला त्यांच्याच ताब्यात आहे. सर्व सुभेदार व हवालदारांना छत्रपती संभाजी महाराजांनी तसेच ठेविले. काही बदल केला नाही".
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
📜 ३ मे इ.स.१६८०
(वैशाख शुद्ध पौर्णिमा, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार सोमवार)
छत्रपती संभाजी महाराजांची इंग्रजांना दहशत!
इंग्रजांनी महाराजांशी केलेला. तह पाळला नव्हता आणि महाराज जंजिरा किल्ला घेऊ शकले नव्हते. आणि महीनाभरापुर्वीच महाराजांचे महानिर्वाण झाल्याने इंग्रजांनी आता स्वैर वागायला सुरुवात केली होती. सिद्दी मुंबई भागात लुटमार करीतच होता. लुटीच्या जहाजांचा उघडपणे लिलाव करून त्यांनी इंग्रजांनाच आव्हान दिले होते. त्यामुळे इंग्रजांचे आता धाबे चांगलेच दणाणले होते. जर छत्रपती संभाजी महाराजांना इंग्रजांचे हे कारनामे आणि सिद्दीला आतून फूस असल्याचे कळले तर छत्रपती संभाजी महाराज सिद्दी व इंग्रज दोघांनाही त्रास देणार हे निश्चितच होते. त्यात कुठलीही शंकाच नव्हती कारण नुकतेच कुठे छत्रपती संभाजी महाराज महाराजांच्या महानिर्वाणाच्या धक्यातून सावरत असताना जर छत्रपती संभाजी महाराजांनी आरमारी युद्ध केले तर स्वराज्याचे वारसदार म्हणून तडफेची लढाई होणार यात शंका नव्हती. त्यामुळे मुंबईकर इंग्रजांनी घाबरून सिद्दीचा दाणागोटा बंद केला व सर्व मदत थांबविली. या वागण्याचा परिणाम मात्र लगेच दिसून आला अन् सिद्दीने नागोठणे पेण, आपटे, बट्टी इथे लुटालूट थांबविली. मुंबईकरांनी छत्रपती संभाजी महाराजांची अगदी सुरुवातीपासूनच किती धास्ती घेतली होती याचा निर्वाळा मिळतो.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
📜 ३ मे इ.स.१७६४
माधवराव पेशवे व हैदरअली यांच्यात लढाईला प्रारंभ!
माधवराव पेशवे यांनी हैदरचा बंदोबस्त करायचे ठरविले. मुरारराव घोरपडे यांना घेऊन मराठी फौज इ.स. १७६२ मध्ये कर्णाटकात उतरली. बाळापुरच्या लढाईत हैदरअलीचा पराभव झाला. त्रिंबकराव पेठ्याने धारवाडपासून तुंगभद्रेपर्यंत खंडण्या वसूल केल्या. मात्र पेशवा फिरताच हैदरने मुराररावांच्या सैन्यावर हल्ला केला. सुत्ती सोडून घोरपडे यांचा इतर प्रदेश हैदरअलीने कबज्यात घेतला. खंडेराव घोरपडे वगैरे बऱ्याच जणांना कैदेत घातले. पुढच्याच वर्षी त्याने बिदनूर घेतले. ते संस्थान हस्तगत करून त्याचे नाव हैदरनगर ठेवले. तेथे टांकसाळ करून त्याने स्वतःची नाणी पाडली. होणावर बंदरात आरमार सिद्ध केले. सोंधे घेतले. सावनूर, हुबळी, धारवाड ही सारी स्थाने हैदरअलीने ताब्यात घेतली. जवळजवळ ५० लाखांचा मुलूख हैदरच्या ताब्यात गेला आणि त्याच्या राज्याच्या सीमा जवळजवळ कृष्णेस येऊन मिळाल्या. माधवराव पेशवे यांचा या बातम्या ऐकून तीळपापड होत असे. हैदरचा बंदोबस्त करावा म्हणून त्यांनी फौज कर्णाटकात उतरली. धुळपाचे मराठी आरमारही मदतीस बोलावले गेले. हैदरचे बळ या मराठी फौजेपुढे कमी होते. समोरासमोर हैदर लढाई करतच नव्हता. गणिमी काव्यानेच लढावयास सुरुवात केली. तो बिदनूरच्या जवळच्या जंगलात लपून बसला होता. रात्री अपरात्री त्याची फौज मराठी फौजेवर तुटून पडे. त्याची मुख्य फौज रट्टेहळळीस होती. मराठी फौज हैदरच्या रट्टेहळळीवरील फौजेवर तुटून पडली. आणि लढाईला प्रारंभ झाला. तुफान संग्राम झाला. हैदरही स्वतः या लढाईत सामील झाला. मात्र मराठी फौज हिरीरीने लढली. मोठा पराक्रम करून मराठी फौजेने हैदरचा पराभव केला. बंकापुर, सावनूर येथेही चकमकी झाल्या. शेवटी सारी मराठी फौज धारवडच्या किल्ल्याच्या समोर आली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
📜 ३ मे इ.स.१८१८
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात ३ मे १८१८ रोजी मेजर एल्ड्रिजने जीवधन किल्ला जिंकला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

Comments
Post a Comment