ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜 ८ जुन इ.स.१६६६
(वद्य द्वितीया, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शुक्रवार)

रामसिंगने महाराजांच्या रक्षणार्थ जास्त काळजीपूर्वक पहाऱ्याच्या सुचना दिल्या. महाराजांचे रक्षण करण्याचा विडाच रामसिंगाने उचललेला दिसतो. शिवाय मिर्झाराजे जयसिंग यांनी दिलेल्या महाराजांच्या जिविताच्या हमीने महाराजांचे रक्षण प्राणपणाने करण्याच्या सूचना रामसिंहाने आपल्या विश्वासू माणसांना पुन्हा एकदा दिल्या.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ८ जुन इ.स.१६६८
पेडण्याचे सुभेदार विरो पंडीत यांस व्हिसेरेईने पाठविलेल्या पत्राची नोंद!
"उपद्व्यापी देसायांना आमच्या राज्यातून हाकलून देण्यात आले आहे. व्हिसेरेईने महाराजांनाही ही गोष्ट कळविल्याचा पुरावा उपलब्ध आहे. गोव्याच्या व्हिसेरेईने बंडखोर देसायांना गोवा राज्यातून हाकलून लावले ते अर्थात कुडाळ मध्ये परत गेले. परंतु महाराजांनी त्यांना पकडून शासन न करता औदार्याने वाढविले. त्यानंतर त्यांनी ज्याअर्थी बंडाळी माजविल्याचा पुरावा उपलब्ध नाही. त्यावरून ते महाराजांचे प्रजाजन म्हणून कुडाळ मध्ये राहीले असले पाहिजेत. महाराजांचा व पोर्तुगिजांचा जो तह झाला तो महाराजांना फायदेशीर नव्हता, असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. परंतु अन्य काही इतिहासकारांचा असा दृष्टिकोन आहे की एका परकी राजवटीने महाराजांशी समान पातळीवर तह केल्याने त्यांच्या राज्यास कायदेशीर मान्यता प्राप्त झाली. कारण तोपर्यंत ते बंडखोर म्हणूनच ओळखले जात होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ८ जुन इ. स.१७०३
व्हिसेरेईने कान्होजी आंग्रे यांस पाठविलेल्या पत्राची नोंद!
  "आमच्या मधल्या मैत्रीची आणि परस्पर सहकार्याची वाच्यता होऊ नये अशी माझी इच्छा आहे. या बाबतीत रामजीपंत व अझमतखान या दोघांशी माझी जी बोलणी झाली आहेत. त्यांचा तपशील आपणाला त्या दोघांकडून कळेलच. इकडे आता पावसाळा सुरू झाला असल्याने समुद्रात वादळ सुरू होण्याची भीती आहे. तो धोका नसल्यास त्या दोघांना मी पाठवून देईन. रामजीपंत आणि अझमतखान या दोघांना कान्होजी आंग्रे यांनी व्हिसेरेईशी मैत्रीची बोलणी करण्यासाठी गोव्यास पाठविले असावे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ८ जून इ.स.१७३३
पंतप्रतिनिधींनी कारस्थान रचून “मराठ्यांच्या तख्ताची जागा” इतिहास प्रसिद्ध रायगड ८ जून १७३३ रोजी सर केला. रायगड किल्ला सर झाल्यानंतर पंतप्रतिनिधींनी बाजीरावास भेटावयास हवे होते. पण पराक्रमाच्या घमेंडीत प्रतिनिधी होते. त्यांनी राजापुरीस जाऊन बाजीरावांची भेट घेण्याचे नाकारले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ८ जून इ.स.१७३९
कॅ. इंचबर्ड आणि चिमाजी अप्पा या दोघांनी इंग्रज मराठे याजमधील  शांततेचा तह होण्यासंबंधी बोलणी  केली. ह्या बोलण्यातून विशेष  फलनिष्पत्ती न दिसल्यामुळे इंग्रजांनी कॅ. गॉर्डान यास शाहू महाराजांकडे तहाची बोलणी करण्यासाठी पाठवले. तो साताऱ्यास शाहू महाराजांपाशीं ८ जून ते ३० जून पर्यन्त होता. त्याने शाहू महाराजांस  हिरे, मोती, माणके आदि मौल्यवान वस्तू भेटीदाखल दिल्या.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ८ जून इ.स.१७८७
मराठी फौजाने गजेन्द्रगड ८ जून १७८७ ला जिंकला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments