Posts

Showing posts from 2021

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳आजचे शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 २० जून इ.स.१६७७ विजापुरचा सुरमा म्हणून, अब्दुल्लाखानाची ओळख होती . हा किल्ले वेल्लोरचा किल्लेदार. राजांनी हा किल्ला घेण्यासाठी जोराची तयारी केली होती. पुढे मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला. अब्दुल्लाखान किल्ला शर्थीने लढवत होता. तेव्हा किल्ल्यावर तोफांचा मारा करण्यासाठी महाराजांनी नजीकच्या २ टेकड्यांवर २ किल्ले बांधले, त्यांची नावे साजरा आणि गोजरा. तोफांचा मारा सुरु झाला. वेल्लोरचा किल्ला रेंगळणार असे दिसताच राजांनी नरहरी रुद्र या सरदारास २ हजार स्वार आणि ५ हजार पायदळ देऊन वेढ्याजवल ठेवले. त्यातच, दि. २० जूनला शेरखान मराठ्यांवर चालून आला, त्याला अडवायला राजे स्वतः गेले. खानाला पळता भुई थोडी झाली. पुढे त्याचा पाठलाग ही केला. शेरखान राजांना शरण आला. त्याची व्हालौर, टेजपठण, भवनगिरीपठण ही ठाणी मराठयांनी ताब्यात घेतली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २० जून इ.स.१६८० छत्रपती संभाजी महाराज रायगडावर छत्रपतींच्या मृत्यूनंतर दिनांक २१ एप्रिल १६८० रोजी आनाजी दत्तो यांनी पुढाकार घेऊन रायगडावर राजाराम महाराजांचे मंचकारोहण करविले व संभाजी राज्यांना अटक करण्यास पन्हाळ्...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 📜 १९ जुन इ.स.१६३६ शहाजहान बादशहाचा गुलाम अलावर्दीखान तुर्कमान याने १४ किल्ले ४ महिण्यात काबीज केले. इ.स.१६३५ शहाजहान बादशहाने दक्षिणेत स्वारी केली. त्याने बागलाण-नाशिककडील किल्ले घेण्यासाठी शाहिस्तेखानाच्या नेतृत्वाखाली अलावर्दीखान यांस नेमले. अलावर्दीखान याने त्या भागातील सर्व किल्ले राजे शहाजीराजे यांच्या लोकांकडून घेतले. त्यासंबंधीचा शिलालेख धोडप किल्ल्यात आहे. त्याचा सारांश पुढीलप्रमाणे:- शहाजहान बादशहाचा क्षुद्रतम गुलाम अलावर्दीखान तुर्कमान याने धोडपचा किल्ला व इतर १४ किल्ले अवघ्या ४ महिन्यांत काबीज केले. चांदवड, अंतराळ, (इंद्रा) राजदेहरे, कोलेर (लोकघेर) कंचना, मंचना, कण्हेर, जवळा, रवळा, मार्कंड्या, अहिवंत, अचलगड, आणि किल्ले रामसेज मात्र नंतर महाराजांनी इ.स. १६७० १६७१ १६७२ या कालावधीत वरिल सर्व किल्ले स्वराज्यात आणले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 १९ जुन इ.स.१६७६ (आषाढ वद्य ४, चतुर्थी, शके १५९८, संवत्सर अनल, वार सोमवार) महाराजांनी (मुहंमद कुलीखान) उर्फ नेतोजी पालकर यांना विधिवत हिंदू करून घेतले.   नेतोजी पालकर (मुहम्मद क...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 📜 १८ जून इ.स. १५७६ हळदी घाटचा रणसंग्राम हळदी घाटचा हा प्रसिद्ध रणसंग्राम १८ जून १५७६ रोजी खमनोर गावानजीक झाला. ह्या युद्धात मेवाड-सेनेचे नेतृत्व स्वतः महाराणा प्रताप सिंह करत होते. ह्या युद्धात महाराणा प्रताप सिंहांच्या बाजूने लढणारे एकमात्र मुस्लीम सरदार होते हकीम खाँ सूरी. महाराणाजींचे २०००० भिल्लांचे सैन्य विरुद्ध मोगलांचे ८०००० सैन्य असे घनघोर युद्ध हळदी घाटात झाले. एक दिवस चाललेल्या ह्या युद्धात दोन्ही बाजूकडील साधारण १७००० सैनिक मारले गेले. मात्र महाराणा प्रताप सिंह विजयी झालेल्या ह्या युद्धात महाराणाजींचा अत्यंत प्रिय घोडा 'चेतक' ठार झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १८ जुन इ.स.१६६५ (आषाढ वद्य प्रतिपदा, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार रविवार) युवराज शंभुराजे व सरसेनापती नेतोजी पालकर मिर्झाराजे जयसिंगांच्या छावणीत दाखल!   कीरतसिंह, उग्रसेन कछवाह व युवराज शंभुराजे, किल्ले पुरंदरास मिर्झाराजे जयसिंगांच्या छावणीत पोहोचले. यावेळी युवराज शंभुराजेंचे वय फक्त ८ वर्षाचे होते. युवराज शंभुराजेंसोबत यावेळी सरसेनापती नेतोजी पालकर ...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 📜 १७ जून इ.स.१६३१ शाहजहानची पत्नी मुमताज़ हीचा वयाच्या ३८व्या वर्षी मृत्यू. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १७ जून इ.स.१६३३ इ. स. १६३० पासून १६३६ पर्यंत पहिली सहा वर्षे बालशिवाजी राजांसह जिजाबाई शहाजीराजांच्या हुकुमानुसार घोड्यावरून एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर फिरत होत्या. निजामाची राजधानी दौलताबाद हा किल्ला मोगलांनी १७ जून १६३३ मध्ये आपल्या ताब्यात घेतला. तेव्हा शहाजीराजांनी संगमनेर येथील पेमगिरी उर्फ भीमगड (शहागड) येथे निजामशहाची गादी स्थापिली व स्वतः वजीर बनले. ह्यावेळी राजमाता जिजाबाई शिवाजी राजांसह जुन्नरास होत्या. आपल्याला पकडण्यासाठी मोगल सरदार येत आहे हे समजताच त्यांनी शिवरायांस शिवापुरी पाठवून दिले. त्यानंतर मोगल सरदाराने जिजाऊना पकडून नाशिक येथे कैदेत ठेवले.राजमाता जिजाबाईंचा चुलता जगदेवराव जाधव याच्या सांगण्यावरून त्यांची सुटका झाल्यावर शिवाजीराजांसह त्या शहाजीराजियांबरोबर राहण्यासाठी संगमनेर येथील पेमगिरीस गेल्या. काही दिवसांनी त्या किल्ल्यास विजापूरकरांनी वेढा दिला. तेव्हा शहाजीराजे निजामशहास घेऊन माहुलीस गेले. व बरोबर जिजाबाई व ...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 १६ जून इ.स.१६५९ विजापुरच्या आदिलशाहने शिवाजी महाराजांविरुद्ध अफझलखान याला एप्रिल १६५९ मध्ये मोहिमेसाठी मुकर्रर केले होते. १६ जून रोजी आदिलशाहने वाई आणि तळकोकणातल्या सर्व वतनदारांना फर्मान पाठवले आणि शिवाजी राजांविरुद्ध खानाला येऊन मिळण्यास सांगितले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १६ जुन इ.स.१६६६ (ज्येष्ठ वद्य नवमी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शनिवार) महाराजांचा औरंगजेब बादशहास विनंती अर्ज! कोंडी कशी फोडावी याचा महाराज रात्रंदिवस विचार करीत होते. महाराजांनी औरंगजेब बादशहाला पुन्हा एक अर्ज केला. त्यात म्हटले होते की, "मी फकीर होण्याचे ठरविले असून मला बनारसला जाण्याची मिळावी". औरंगजेब बादशहाने कळविले, "फारच चांगले! महाराजांनी फकीर होऊन प्रयागच्या किल्ल्यात रहावे बहादुरखान तिथला सुभेदार आहे. तो महाराजांवर लक्ष ठेवील". प्रयागचा किल्ला राजकीय कैद्यांना ठेवण्यासाठी कुख्यात होता. अर्थात महाराजांना हे मंजूर नव्हते. त्यामुळे प्रश्न कायमच राहिला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 १६ जुन इ.स.१६७० (आषाढ शुद्ध नवमी, शके १५९७,‌ ...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 📜 १५ जून इ.स.१६६५ (आषाढ शुद्ध त्रयोदशी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू,वार गुरुवार) महाराज जड अंतःकरणाने किल्ले राजगडी सुखरुप परत!    तह स्वीकारल्याचे मनोमन इतके दुःख महाराजांना वाटले की, जड अंतःकरणाने महाराजांनी ते स्वतःच स्वीकारले. मात्र ते कोणाजवळ व्यक्त करण्याचे धाडसही महाराजांना नव्हते. रयतेची, सैन्याची, प्रजेची, स्वराज्याची आधिक नासाडी होऊ नये म्हणून हा तह चाणाक्ष बुद्धीने आणि चातुर्याने स्वीकारून महाराजांनी स्वराज्य साफ बुडण्यापासून वाचविले. हा जगप्रसिद्ध तह आणि तहाचा अभ्यास मुळात संपूर्णपणे केल्यास महाराज काय होते याची खात्रीच पटते मात्र त्यानंतर महाराज किल्ले राजगडी परतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १५ जून इ.स.१६७५ महाराजांचा बहादुरखानाचा तह !           किल्ले पुरंदरला बहादुरखानाच्या वकिलांना परत पाठविले असले तरी महाराजांनी बहादुरखानाशी तहाची बोलणी सुरूच ठेवलेली होती असे दिसते. अखेरीस महाराजांनी मोगलांपासून घेतलेला मुलुख, व १७ किल्ले मोगलांना परत करावेत, साल्हेर व मुल्हेर । की सातारा व मावळ? महाराजांकडे रहावेत, दख्खनची सरदेसाईपण...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष⛳ 📜 १४ जुन इ.स.१६६५ (आषाढ शुद्ध द्वादशी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार बुधवार) छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजेंची छावणी सोडली व कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला.   स्वराज्यावर चालून आलेल्या मोगली सरदार मिर्झाराजे जयसिंहानी औरंगाबादला आल्यापासून वेगवान हालचाली करत स्वराज्याची चोही बाजूनी नाकाबंदी सुरू केली.पुरंदर किल्ल्याला वेढा दिला,आणि मोगली सैन्याने स्वराज्यातील मुलखाला उपद्रव देणे सुरू केले. या संकटाची तीव्रता लक्षात येताच शिवाजी महाराजांनी मिर्झाराजेंशी तहाची बोलणी सुरू केली. ठरल्यानुसार महाराज मिर्झाराजेंच्या छावणीत तहाचा मसुदा ठरवण्यासाठी दाखल झाले.तह पक्का होऊन त्यानुसार महाराजांनी मुघलांना ४  लाख होनांचा मुलुख ,२३किल्ले देण्याचे ठरले. तहाच्या वाटाघाटी निश्चित झाल्यावर मिर्झाराजेंनी महाराजांना परत जाण्यासाठी निरोप दिला. यावेळी त्यांनी महाराजाना १ हत्ती व २घोडे नजर केले. तहात ठरलेला कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात देण्यासाठी स्वतः शिवाजी महाराज मुघल सरदार किरतसिंह कछवाह यांच्यासोबत कोंढाण्याकडे निघाले. 🏇🚩🏇🚩🏇...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष⛳ 📜 १३ जून इ.स.१६६५ पुरंदरची युद्धबंदी झाल्यानंतर तहासाठी राजेश्री शिवाजीराजे आणि मिर्झाराजे यांच्या गाठीभेटी झाल्या यावेळी मिर्झाराजांचा तळ पुरंदराच्या पायथ्याशी होता. त्यानंतर राजांनी दिलेरखानाशी पुरंदर माचीवर जाऊन गाठीभेटी केल्या व औपचारिकतेचे बोलणे झाले निरोपाचे विडे दिले गेले, त्यानंतर राजे पुन्हा मिर्झाराजांकडे आले.. दि. १३ जून रोजी रात्री मिर्झाराजे व महाराज यांनी तहाचा पाच कलमी मसुदा पक्का केला त्यानुसार : १. महाराजांकडे लहान-मोठे २३ किल्ले, त्यातील १ लाख होणा (५ लाख रुपये) वसुलासह, शाही कृपेचे प्रतिक म्हणून ठेवण्यात येतील. यापुढे महाराजांनी औरंगजेबाविरुद्ध बंडखोरी करू नये वा मोगली मुलुख लुटू नये. . २. दख्खनच्या सुभ्यात कुठलीही शाही कामगिरी महाराजांवर सोपविल्यास ती त्यांनी पूर्ण करावी.. ३. शिवाजीपुत्र संभाजीला मोगलांची पंचहजारी मनसबदारी बहाल करण्यात येईल. त्यांच्या वतीने (शंभूराजांचे वय यावेळी फक्त आठ वर्षांचे होते.) प्रती-शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेतोजी पालकरास सदैव दख्खच्या सुभेदाराच्या तैनातीत राहावे लागेल.. ४. विजापुरी ...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष⛳ 📜 १२ जुन इ.स.१६४९ मराठ्यांनी चाकण प्रांत व किल्ले संग्रामदुर्ग स्वराज्यात दाखल करून घेतले. चाकण हा भुईकोट आहे. चाकणची निर्मिती कोणी केली हे अद्यापही ठाऊक नाही. बहामनीच्या राजवटीत चाकण हे सुभ्याचं मुख्य ठिकाण होतं. पुढे चाकणच्या किल्ल्यासाठी अहमद निजाम व बहामनी सरदार आदिलखान (आदिलशाहीचा संस्थापक) यांच्यात लढाई होऊन चाकणचा सुभेदार जैनुद्दीनसह सातशे जण मारले गेले. निजामशाहीचा अस्त होईपर्यंत चाकण निजामाच्याच ताब्यात होते. शहाजीराजांनी सन १६६३ मध्ये निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला त्या वेळी चाकण शहाजीराजांच्या ताब्यात होते.‌‌ स्वराज्य स्थापनेच्या वेळी चाकण आदिलशाहीच्या ताब्यात असून त्यावर आदिलशाहीचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा हा होता.‌ आदिलशाहीने चाकणचं नाव इस्लामाबाद केले होतं. पुढे शिवाजी महाराजांनी चाकणचा इस्लामाबाद जिंकून घेतला. किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांचे मन जिंकून घेऊन त्यांना स्वराज्याच्या कामी आणलं, शिवाजी राजांनी चाकणच्या किल्ल्याचं नाव संग्रामदुर्ग ठेवून फिरंगोजी नरसाळा यांनाच किल्लेदारी दिली. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 १२ जु...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष⛳ 📜११ जुन इ.स.१६६५ "छत्रपती शिवाजी महाराज" आणि "मिर्झाराजे जयसिंग" यांच्यात प्रसिद्ध "पुरंदरचा तह" इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. शिवाजीमहाराजांसाठी परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे वडील शहाजीराजे कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या आश्रयाने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन इ.स.१६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १४ मे इ.स.१६५७ गु...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜१० जून इ.स.१६४० #हिंदवी स्वराज्याचे पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांच्या ३८१ व्या जयंती निम्मित विनम्र अभिवादन सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचा जन्म जावळीच्या खोऱ्यातील गणी गावात झाला. चार छत्रपतींच्या सोबत इमानाने राहिलेलं मोजक्या घराण्यातील एक गोळे घराणे, ह्याच गोळे घराण्यातील इतिहासात एकनिष्ठ म्हणून उल्लेख आढळतो. पिरंगुट या गावी त्यांची पवित्र समाधी आहे व जगदीश्वराचे मंदिर पण आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १० जुन इ.स.१६५८ औरंगजेबाचा पहिला दरबार आग्रा येथे भरला. आता औरंगजेब आग्रा येथे शिरला. थोड्याच दिवसांत शहाजहान कैद झाला आणि औरंगजेबाचा पहिला दरबार १० जुन इ.स.१६५८ रोजी आग्रा येथे भरला. औरंगजेबाने पहिले सिंहासनारोहण केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १० जुन इ.स.१६६१ (ज्येष्ठ वद्य अष्टमी, शके १५८३, संवत्सर प्लव, वार सोमवार) कल्याण-भिवंडी महाराजांच्या ताब्यात!    महाराजांनी कल्याण-भिवंडी मोहीम करून या भागावर आधिपत्य प्रस्थापित केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १० जुन इ.स.१६६४ अजीजखान वेंगुर्ला येथे मृत्यू पावला. अजीजखान आल्याचे कळत...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष⛳ 📜 ९ जून इ.स.१६५९ ९ जून १६५९ रोजी औरंगजेबाने दारा शिकोह याला कैद केले. कैदी दाराला पकडल्या गेल्यानंतर पूर्ण कल्पना होती की आपण मारले जाणार आहोत. दाराला देहांताची शिक्षा देण्यापूर्वी औरंगजेबाने त्यास निरोप पाठवून असे विचारले की, "दैव आज तुला जितके प्रतिकूल झाले आहे , तितकेच अनुकूल झाले असते. आणि मला (औरंगजेबाला) तू कैद केले असतेस तर तू काय केले असते..? यावर दाराने राजपुत्र या दृष्टीने आपल्या व्यक्तित्वास साजेसे उत्तर दिले.. "अशी परिस्थिती आली असती तर (मी) तुझ्या शरीराचे चार तुकडे करून दिल्लीच्या चार दरवाजांच्या पुढे उघडे फेकून देण्यास सांगितले असते" हे उत्तर कळविल्यानंतर औरंगजेबाने दारास देहांताची शिक्षा फर्मावली. #थोडे_अपरिचित_उद्गार.. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ९ जुन इ.स.१६६१ महाराजांचा महाड येथे मुक्काम !   महाराजांनी कुडाळकर सावंतांकडे दुर्लक्ष केले. व ते किल्ले राजगडाकडे जाण्यासाठी पुढे निघाले. महाराज महाडला पोहोचले. महाड येथे मुक्काम सुमारे २ दिवस होता. राजापुरचे सुभेदार रावजी पंडितही महाराजांच्या...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 ८ जुन इ.स.१६६६ (वद्य द्वितीया, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शुक्रवार) रामसिंगने महाराजांच्या रक्षणार्थ जास्त काळजीपूर्वक पहाऱ्याच्या सुचना दिल्या. महाराजांचे रक्षण करण्याचा विडाच रामसिंगाने उचललेला दिसतो. शिवाय मिर्झाराजे जयसिंग यांनी दिलेल्या महाराजांच्या जिविताच्या हमीने महाराजांचे रक्षण प्राणपणाने करण्याच्या सूचना रामसिंहाने आपल्या विश्वासू माणसांना पुन्हा एकदा दिल्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ जुन इ.स.१६६८ पेडण्याचे सुभेदार विरो पंडीत यांस व्हिसेरेईने पाठविलेल्या पत्राची नोंद! "उपद्व्यापी देसायांना आमच्या राज्यातून हाकलून देण्यात आले आहे. व्हिसेरेईने महाराजांनाही ही गोष्ट कळविल्याचा पुरावा उपलब्ध आहे. गोव्याच्या व्हिसेरेईने बंडखोर देसायांना गोवा राज्यातून हाकलून लावले ते अर्थात कुडाळ मध्ये परत गेले. परंतु महाराजांनी त्यांना पकडून शासन न करता औदार्याने वाढविले. त्यानंतर त्यांनी ज्याअर्थी बंडाळी माजविल्याचा पुरावा उपलब्ध नाही. त्यावरून ते महाराजांचे प्रजाजन म्हणून कुडाळ मध्ये राहीले असले पाहिजेत. महाराजांचा व पोर्तुगिजा...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 ७ जुन इ.स.१६४९ एका खुर्दखतानूसार चाकण परगणा महाराजांकडे ! राजे शहाजीराजे विजापुरकडेच असल्यामुळे पुढील ४, चार ते ५, पाच वर्षाच्या काळात महाराजांनाही स्वराज्य विस्तारासाठी विशेष हालचाली करता आल्या नाहीत. या काळातील महाराजांच्या सत्तेतील झालेली चढ उतार म्हणजे फतहखान स्वारी पुर्वी घेतलेला किल्ले पुरंदर आदिलशहाने महाराजांकडेच ठेवला. तर तत्पुर्वी घेतलेला कोंढाणा मात्र आदिलशहाला परत द्यावा लागला. खुर्दखतानूसार चाकण परगणा महाराजांकडे आलेला दिसतो. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ७ जुन इ.स.१६६६ (ज्येष्ठ वद्य प्रतिपदा, शके १५८८, संवत्सर पराभव, वार गुरुवार) महाराज सुटकेच्या मार्गाच्या शोधात!           महाराज सुटण्यासाठी अनेक मार्ग शोधत होते. परंतु रामसिंह दुहेरी कात्रीत सापडला होता. मिर्झाराजे जयसिंहच्या शब्दात रामसिंह एकीकडे आडकला होता. तर महाराजांना जामीन राहून औरंगजेब बादशहाने रामसिंहाला दुसऱ्या बाजूने जामिनकीतून मोकळे होण्यास सांगितले मात्र रामसिंहाने तसे करण्यास साफ नकार दिला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ७ जुन इ.स.१६८१ मुल्हेर किल्ल्याचा किल्लेदार...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 📜 ६ जून इ.स.१६६० (ज्येष्ठ शुद्ध ८, अष्टमी, शके १५८२, संवत्सर शार्वरी, वार बुधवार) मराठ्यांनी किल्ले वासोटा गड जिंकून घेतला! सरनौबत नेतोजी पालकर यांनी थेट विजापुरलाच ५ हजार सैन्यासह धडक दिली होती. महाराज पन्हाळ्यात कोंडले गेले होते. शाइस्तेखान पुणे प्रांतात धुमाकूळ मांडू लागला, तरी मराठ्यांचे मनोधैर्य वाखाणण्याजोगे होते. मराठ्यांची दुसरी तुकडी यावेळी कोकणात दाभोळ ते कुडाळ हा आदिलशाही मुलुख लुटून फस्त करीत होती. महाराजांचे ३ ते ४ हजार लोक किनारपट्टीवर निर्भयपणे वावरत होते. व खंडणी वसूल करीत होते. विपरीत परिस्थितीतही मराठ्यांनी विजापुरकरांकडील किल्ले वासोटा गड जिंकून घेतला. महाराज स्वतः पन्हाळ्यावर वेढले गेल्याचे वृत्त कळताच स्वराज्य पेटून उठले होते. प्रत्येक जण जमेल त्या पद्धतीने तरवार गाजवीत होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ६ जुन इ.स.१६७३ सुरतकरांचा भ्रमनिरास करून मुंबईकर इंग्रजांनी कंपनीला कळविलेले वृत्त !            प्रेसिडेंटच्या पत्राचे उत्तर घेऊन भीम पंडीत नावाचा महाराजांचा इसम इंग्रजांकडे जाईल असा महाराजांनी निरोप पाठविला. टॉमस निकल्...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 📜 ५ जुन इ.स.१६५९ औरंगजेब बादशहाने धुमधडाक्यात पुन्हा सिंहासनारोहण केले. औरंगजेब बादशहाने सिंहासनारोहणाचे सोहळे यापुर्वीही साजरे केल्याचे संदर्भ सापडतात. पण त्यावेळी त्याच्या चित्तास स्वस्थता नव्हती. दारा व इतर बंधुंचा कायमचा बंदोबस्त व्हायचा होता. तो आता झाला. दारा शुकोह कैद झाला. औरंगजेब बादशहाचा पहिला सिंहासनारोहण १० जुन इ.स.१६५८ झाला. व तत्पुर्वी २१ जुलै इ.स.१६५८ व त्यानंतर आता ५ जुन इ.स.१६५९ज्ञपुन्हा उत्साहात करायचे ठरले. यावेळी महाराजांतर्फे सोनोपंत नजराणा घेऊन दिल्ली-दरबारी उपस्थित होते. त्यांनी नजराणा व महाराजांची अर्जदास्त औरंगजेब बादशहाला पेश केली. यावेळी औरंगजेब बादशहा कधी नव्हे एव्हढा आनंदी होता. त्याने महाराजांना फर्मान पाठविले, एव्हढेच नव्हे तर, आपल्या लोभाचे प्रतिक म्हणून महाराजांसाठी पोषाखही पाठविला. सोनोपंत तो पोषाख व फर्मान घेऊन जावळीस दाखल झाले. फर्मानात औरंगजेब बादशहाने "इकडील लोभ आपणावर पुर्ण आहे असे जाणून असावे अशी ग्वाही दिलेली होती. पंत फार मोलाची कामगिरी करून आले होते. अफजलखानाचे संकट उदभवले असताना औरंगजेब बादशहा ...

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 ४ जून इ.स.१६५७ (आषाढ शुद्ध त्रृतीया, शके १५७९) अहमदनगरवर मराठ्यांचा हल्ला!     मोगली सैन्य जुन्नरकडे जमा होऊ लागलेले पहाताच महाराजांनी अहमदनगरवर हल्ला चढविला. नौसीरखान तातडीने महाराजांवर चालून आला. अहमदनगरला मात्र महाराज व नौसीरखानाची लढाई जुंपली. यात मोगलांचा जोर जास्त होता. त्यामुळे अनेक मावळे मारले गेले. काही जखमी झाले. तेव्हा महाराजांनी पाय मागे घेतला. तरीही महाराजांनी मोगलांचे ७०० घोडे व काही हत्ती पाडाव करून नेलेच. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ४ जून इ.स.१६७४ (ज्येष्ठ शुद्ध एकादशी, शके १५९६, संवत्सर आनंद, वार गुरुवार) राज्याभिषेक विधींना सुरूवात!             रात्री निऋर्तियाग झाला, या यागात इतर यागद्रव्यांसोबत पक्व व अपक्व मांस, मत्स्य व सुरा यांचेही बलिदान झाले. कृष्णवस्त्र धारण करून हा विधी केला. कृष्ण पुष्प गंधानेच पुजा केली. हा विधी आटोपल्यावर शुभ्र वस्त्र परिधान करून पुण्याहवाचन झाले. गोदान दक्षिणा होऊन त्यादिवशीचा सोहळा आटोपला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ४ जून इ.स.१६८१ पोर्तुगीज व्हॉईसराय आंतनियू प्राईज द सादे यांनी आण्णाजी...